भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही.
नवी दिल्ली प्रतिनिधी-भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही.
१ सप्टेंबर २०२६ पासून, भारतामधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी प्रत्यक्ष (फिजिकल) बोर्डिंग पास किंवा त्यावर शिक्का मारण्याची अनिवार्य गरज असणार नाही. प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनमधील डिजिटल ई-बोर्डिंग पास ,त्याऐवजी, परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई-बोर्डिंग पास दाखवून पुढे जाता येईल.
बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारायच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.