vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुढची २५ वर्षे देशासाठी महत्त्वाची असून यामध्ये कर्तव्य, कर्तव्य, कर्तव्य हा मंत्र जपायला हवा असं मोदी म्हणाले.

पुढची २५ वर्षे देशासाठी महत्त्वाची असून यामध्ये कर्तव्य, कर्तव्य, कर्तव्य हा मंत्र जपायला हवा असं मोदी म्हणाले.

दिल्ली प्रतिनिधी  :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचं पावित्र्य कायम राखण्यासाठी गुणवत्तापूर्ण वादविवाद व्हायला हवा असं म्हटलं आहे. ते शिमल्यात आय़ोजीत करण्यात आलेल्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या ८२ व्या अखिल भारतीय परिषदेला व्हर्च्युअली संबोधित करत होते. यावेळी त्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांची संविधान, सभा आणि जनतेसाठी असेलली जबाबदारी यावर संवाद साधला. सदनात क्वालिटि डिबेट व्हावं आणि राजकीय चिखलफेक नको असं म्हणत सदनात संवादावर भर द्यायला हवा असंही मोदींनी म्हटलं.

मोदी म्हणाले की, आपल्या संसदेची परंपरा आणि व्यवस्था ही भारतीय हवी. आपली रणनिती, कायदा हा भारतीयत्व, एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पाला बळ देणारा असावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संसदेत आपला स्वत:चा वावर हा भारतीय मूल्यांप्रमाणे असावा ही आपली जबाबदारी आहे. आपला देश हा विविधतेने संपन्न असा आहे. हजारो वर्षांच्या विकासाच्या प्रवासात आपण विविधतेत एकता आणि अखंडता कायम ठेवली आहे. हीच एकता आपल्या विविधतेला आणखी मोठं करते, तसंच संरक्षण करते. सदनामध्ये वर्षातून ४-५ दिवस असे ठेवता येतील का जे समाजासाठी काही विशेष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांचा अनुभव सांगता येईल असाही प्रश्न मोदींनी विचारला.देशाला गेल्या काही वर्षात एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. अनेक असामान्य अशा गोष्टी साध्य केल्या आहेत. प्रत्येकाच्या प्रयत्नामुळे हे शक्य होऊ शकतं. लोकशाहीत जेव्हा आपण प्रत्येकाच्या प्रयत्नाबद्दल बोलतो, भारताच्या व्यवस्थेबद्दल बोलतो तेव्हा सर्व राज्यांची भूमिका महत्त्वाची ठरते असंही मोदी म्हणाले

संबंधित पोस्ट

महिलांना सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पत्रकार यांनी एकत्रपणे काम महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे

मुंबई उच्च न्यायालयाची मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मनाई, मुंबईऐवजी खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा, असे आदेश

बार्टीच्या त्या ७६३ विद्यार्थ्यांना संपूर्ण अधिछात्रवृत्ती

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त…गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन!संत-महंत, मंत्री यांच्यासह २० हजारांहून अधिक साधक-धर्मनिष्ठ उपस्थित रहाणार!

शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी…

vishwatmaklokswamivarta