vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यभर बहुचर्चित असलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपाने गाजणाऱ्या विधानपरिषदेच्या नागपूर जागेवरच्या निवडणुकीत अखेर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली

राज्यभर बहुचर्चित असलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपाने गाजणाऱ्या विधानपरिषदेच्या नागपूर जागेवरच्या निवडणुकीत अखेर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली …

नागपूरः राज्यभर बहुचर्चित असलेल्या आणि आरोप-प्रत्यारोपाने गाजणाऱ्या विधानपरिषदेच्या नागपूर जागेवरच्या निवडणुकीत अखेर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. आज झालेला आपला विजय हा नाना पटोलेंचा पराभव आहे. या निवडणुकीत काँग्रेसनं घोडेबाजार केला आहे, असा आरोप त्यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

असा लागला निकाल?

विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. निवडणूक आयोगाने सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या, तर नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक लागली होती. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. यामध्ये भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. छोटू भोयर यांच्या जागेवर काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख पराभूत झाले आहेत.

बावनकुळे आक्रमक

विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावेळी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आपण आज मिळवलेला विजय हा नाना पटोले यांचा पराभव आहे. या निवडणुकीत काँग्रेसने घोडेबाजार केला. मला 362 मते मिळाली. त्यात 44 मते जास्त पडली. मी सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

नानांची मोगलाई

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माझा विजय हा नाना पटोले यांचा पराभव आहे. या निवडणुकीत त्यांनी आणि महाविकास आघाडीने पैशांचा अक्षरशः घोडेबाजार मांडला होता. त्यांनी पदाचा गैरवापर केला. नाना पटोले यांच्या मोगलाईमुळेच काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. बावनकुळे पुढे म्हणाले की, मी पक्षाचे दहा वर्षे काम केले आहे. माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या हुकमशाही काँग्रेसचा पराभव झाला, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना -२६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण आराखडा तयार करा- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण वाढलं देशात पाच महिन्यानंतर सर्वात कमी सक्रीय रुग्ण…

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 12 जिल्हयातील 28 केंद्रांवर परीक्षा प्रक्रीया सुव्यस्थित संपन्न…

vishwatmaklokswamivarta

2 वर्षात 200 एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार – आमदार विलास तरे# परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीत निर्णय

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

२०२४ च्या ८.४४ % महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची परतफेड

vishwatmaklokswamivarta