vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवी दिल्लीत १९ मार्चपासून ‘महाराष्ट्र साडी महोत्सव’ राज्याचा विणकाम वारसा आता देशाच्या राजधानीत

नवी दिल्लीत १९ मार्चपासून ‘महाराष्ट्र साडी महोत्सव’

राज्याचा विणकाम वारसा आता देशाच्या राजधानीत

नवी दिल्ली, प्रतिनिधी –

भारतीय संस्कृती आणि वस्त्रांचा अनमोल वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रातील विणकरांच्या कलेला दाद देण्यासाठी आणि राज्याचा गौरवशाली हातमाग वारसा साजरा करण्यासाठी, नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे भव्य महाराष्ट्र साडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत कस्तुरबा गांधी मार्ग येथील महाराष्ट्र सदन येथे हा सोहळा रंगणार असून, यामध्ये महाराष्ट्राची शान असलेली पैठणी, औरंगाबादचे प्रसिद्ध हिमरू, खण, नारायणपेठी, हॅन्ड पेंटेड साडी यांसह इतर अस्सल हस्तकला कापडांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

या महोत्सवाचा मुख्य उद्देश राज्यातील विणकर आणि कारागीर समुदायासाठी व्यापक प्रसिद्धी आणि बाजारपेठेतील नवीन संधी निर्माण करणे हा आहे. या महोत्सवांतर्गत २१ मार्च २०२६ रोजी एका विशेष फॅशन शोचे देखील आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रकलेला आधुनिक व्यासपीठ मिळणार आहे. या फॅशन शोच्या माध्यमातून राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार असून, यामुळे उपस्थित विणकर आणि सहभागी कारागिरांना मोठी प्रेरणा मिळणार आहे.

सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले असणाऱ्या या प्रदर्शनात ग्राहकांना थेट विणकरांकडून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे साड्यांच्या शुद्धतेची खात्री आणि रास्त दर मिळण्यास मदत होईल. आधुनिक काळातील महिलांच्या आवडीनुसार पारंपरिक विणकामाला नव्या डिझाईन्सची जोड देऊन येथे विविध साड्यांचे प्रकार मांडले जाणार आहेत. दिल्लीतील साडी प्रेमींनी आणि नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन महाराष्ट्राच्या या समृद्ध वारशाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

टी. सी. महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम…

जिल्हा परिषद अनुकंपा उमेदवारांचीतात्पुरती सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्दआक्षेप, हरकतींसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

राज्य निवडणूक आयुक्तांकडून महानगरपालिका निवडणुक तयारीचा आढावा

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा काढून सिन्दुर ऑपरेशनचा विजय साजरा*