vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२५-२६ मध्ये सांगली जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्या माध्यमातून अंमलात आणली जाणार आहे.

     या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष या अधिसूचित फळपिकांचा समावेश असून शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे, विशेषतः गारपीटीमुळे (Add-on Cover) नुकसान झाल्यास, विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानाची माहिती विमा कंपनी किंवा संबंधित मंडळ कृषि अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. यानंतर विमा कंपनीकडून जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या समन्वयाने प्रत्यक्ष पाहणी करून वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी Bajaj Allianz General Insurance Company Limited (टोलफ्री: १८०० २०९ ५९५९) यांच्याशी संपर्क साधावा

     गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी वेळेत माहिती देऊन पंचनामे करून घ्यावेत, तसेच या योजनेचा लाभ घेऊन फळपिकांचे आर्थिक संरक्षण करावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने लेखक दिनकर काकडे साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांविषयी शासन संवदेनशील*  *येणारा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावा**- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

देशभक्तीच्या प्रकाशात चमकला के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा 66वा वर्धापनदिन..! जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा अखंड 30 वर्षांचा प्रेरणास्त्रोत’शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग संपन्न..!

vishwatmaklokswamivarta

23 व्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका नगररचना विभागाचा माहितीपूर्ण स्टॉल

vishwatmaklokswamivarta

नवलारी गडचिरोली: महिला सक्षमीकरणाचा ‘गड’