vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदममाझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा

विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम

माझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा..

 

मंत्रालय प्रतिनिधि :विधानसभेचं हिवाळी अधिवेशन काम कमी आणि गदारोळानं जास्त गाजतंय. कालचा दिवस तर नितेश राणे, सुहास कांदे, भास्कर जाधव, फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजलं. पण त्याच वेळेस विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदम.  विशेष म्हणजे दोघांनाही भाई म्हटलं जातं. रामदास कदमांनी निरोपाचं भाषण मात्र आटोपशीर केलं. अवघ्या सात मिनिटात त्यांचं भाषण संपलं पण हेच सात मिनिटांचं भाषण चर्चेत राहिलं. त्याला कारण आहे ते रामदास कदम यांचं गेल्या काही काळापासून शिवसेनेसोबतच सुरु असलेलं भांडण. त्याचाही उल्लेख त्यांनी भाषणात केला. कोकणासाठी काय करु शकले नाहीत, तेही रामदास कदमांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

नेमकं काय म्हणाले रामदास कदम?

रामदास कदम यांनी अडीच वर्षापूर्वीच राजकारणातून रिटायरमेंट जाहीर केलीय. पण तरीही विधान परिषदेसाठी ते उत्सूक असल्याची चर्चा कायम रंगली. त्यातच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यासोबत त्यांचा झगडा सुरु झाला. तो शेवटी एकमेकांचे जाहीर वाभाडे काढण्यापर्यंत पोहोचला. रामदास कदम ज्यावेळेस निरोपाचं भाषण करायला उभे राहीले त्यावेळेही त्यावर त्या वादाची छाया स्पष्ट जाणवत होती. पण कदमांनी यावेळी वादावर न बोलता, माझ्यानंतर उद्धवला साथ द्या, बाळासाहेबांच्या ह्या वक्तव्यावर भर दिला. एवढच नाही तर कदम म्हणाले की, बाळासाहेबांच्या आत्म्याला वेदना होतील अशी एकही गोष्ट माझ्या हातून घडणार नाही. ते म्हणाले- पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही, मराठा माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना ह्या घोषवाक्यासह माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला. त्या घोषवाक्याकडे आकर्षीत होऊन मी 1970 साली शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. त्याला आता 52 वर्षे होतायत. एक शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, आमदार, नामदार, मी स्वत:ला भाग्यवान समजतो सभापती महोदय, अनेक वर्षे 40-45 वर्ष मला शिवसेनाप्रमुखांच्या सानिध्यात काम करण्याची संधी मिळाली.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात उर्फी जावेदच्या कपड्यांशिवाय कोणताचं मुद्दा राहिला नाही: संजय राऊत यांचासामनामधून भाजपवर निशाणा…

vishwatmaklokswamivarta

युद्धनौका INS विक्रांतच्या पैशाला फुटले पाय… पोलिसांच्या चौकशीत समोर येईल आणखी काय काय… राऊत यांचा इशारा…

शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनाही उमेदवारी

vishwatmaklokswamivarta

किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ, असं म्हणत मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सेनेचे आदेश बांदेकर विरोध दर्शविला आहे

vishwatmaklokswamivarta

सतीश घाटगे पाटील सर्वात आदर्श लोकप्रतिनिधी…म्हणून माझा त्यांना पाठींबा – माजी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड,सतीश घाटगे यांचे व्हिजन जनहिताचे : टोपे, उढाण जनतेच्या प्रश्नांसाठी कधी आले नाही   

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष..!