vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र हादरला! वाळू माफियांकडून तहसीलदाराला जेसीबीच्या सहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न…

 महाराष्ट्र हादरला! वाळू माफियांकडून तहसीलदाराला जेसीबीच्या सहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न…

सोलापूर प्रतिनिधी जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून अवैध वाळू वाहतूकवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदाराला वाळू माफियांकडून जेसीबीच्या सहाय्याने चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वेळीच तहसीलदार आणि त्यांच्या पथकाने स्वतःच बचाव करून तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला.

 

राहुल गायकवाड ( वय ४६, रा. केपी मार्केट वैजापूर ) असे या तहसीलदारांचे नाव आहे. तर याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

 

तहसीलदार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी ते १० मार्च रोजी रात्री आपल्या पथकासह गस्तीवर असताना लाखणी शिवारातील शिवना नदीपात्रातून अवैध वाळू चोरली जात असल्याची माहिती गायकवाड यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता शिवना नदीपात्रात त्यांना एका टिप्परमध्ये जेसीबीच्या साह्याने वाळू भरताना पाहायला मिळाली. पण पथक पोहचताच टिप्पर चालक पळून गेला. मात्र त्याचवेळी तेथे एक जेसीबी आढळून आला.

 

पथक जेसीबी ताब्यात घेण्यासाठी जात असतानाच तिथे मुळे नावाचा व्यक्ती आला आणि त्याने महसूल पथकाला जेसीबी ताब्यात घेण्यापासून रोखले. तर सोबत आणलेल्या एका व्यक्तीला थेट अंगावर जेसीबी घालण्याच्या सूचना दिल्या आणि तहसीलदार यांच्या दिशेने जेसीबीची सोंड जोरजोराने फिरवली. यावेळी जीव वाचवण्यासाठी पथक पळत असताना पुन्हा त्यांना जेसीबीची सोंडने चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र कसेबसे जीव वाचवून पथकाने पळ काढला.

राजकीय पाठबळ…

वाळूला सोन्याचं भाव मिळत असल्याने अवैध वाहतूक अधिक वाढली. त्यात शासकीय टेंडर कुणी घेत नसल्याने अवैध वाहुतक अधिक वाढली. तसेच राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळत असल्याने या लोकांची हिम्मत अधिक वाढली आहे. हप्ते देऊन अवैध वाहतूक करू द्या अन्यथा अशाप्रकारे हल्ले करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न वाळूमाफियांकडून सतत सुरू आहे.

संबंधित पोस्ट

देशभरात ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन– केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया

vishwatmaklokswamivarta

खासदार श्रीकांत शिंदेचे लोकसभेत हनुमान चालीसेचे पठण,महाविकास आघाडीच्या काळात हनुमान चालीसा बोलण्यात मनाई होती असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला…

कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या याचा समावेश असलेल्या न्यायालयीन अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील वर्षी अठरा जानेवारी रोजी अंतिम सुनावणीआता आणखी काळ वाट पाहता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

vishwatmaklokswamivarta

६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका उपलब्ध-२८ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांचे आवाहन

राज्यात चार-पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024/  17-परभणी मतदारसंघासाठी आज मतदान मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू