vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत पेपरफुटी, मुंबई पोलिसांकडून मालाड येथील खासगी क्लासमधील शिक्षकास अटक

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत पेपरफुटी, मुंबई पोलिसांकडून मालाड येथील खासगी क्लासमधील शिक्षकास अटक…

मुंबई प्रतिनिधीराज्यात पुन्हा एकदा पेपरफुटी (HSC Exam Paper Leak) झाल्याची घटना पुढे येत आहे. इयत्ता बारावीचा रसायनशास्त्र (Chemistry) विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मालाड (Malad) येथील एका खासगी कोचिक क्लासेसच्या शिक्षकास अटक केली आहे

राज्यात पुन्हा एकदा पेपरफुटी (HSC Exam Paper Leak) झाल्याची घटना पुढे येत आहे. इयत्ता बारावीचा रसायनशास्त्र (Chemistry) विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मालाड (Malad) येथील एका खासगी कोचिक क्लासेसच्या शिक्षकास अटक केली आहे. या शिक्षकाने इयत्ता बारीवी बोर्ड परीक्षेचा पेपर आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांना दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्यात पाठीमागील काही काळापासून पेपरफुटीची बरीच प्रकरणे पुढे आली आहेत. ही प्रकरणे नोकरभरती संबंधित होती. मात्र, आता त्या श्रृंखलेत बोर्ड परीक्षाही आल्या आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

मुकेश यादव असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेपूर्वीच पेपर या शिक्षकाच्या मोबाईल वर आला होता. हा पेपर या शिक्षकाने आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवर पाठवला. क्लासमध्ये शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर पाठविण्यात आला. केमेस्टी (रसायनशास्त्र) या विषयाचा पेपर शनिवारी झाला. मात्र, तत्पूर्वीच या शिक्षकाने हा पेपर फोडल्याचे पुढे आले आहे

 

संबंधित पोस्ट

दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रकआळंदी येथील अधिवेशनात वारकर्‍यांचा ‘धर्मजागर’ करण्याचा एकमुखी निर्धार *हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांच्या वर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी !* – प.पू. गोविंददेव गिरी, कोषाध्यक्ष, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित लाल किल्ल्यावर  9 व्यांदा ‘तिरंगा’ फडकवला. ही परंपरा पुढे चालू ठेवत ते लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, भारत ही लोकशाहीची जननी आहे. आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. आज जगाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा अभिमानाने आणि गौरवाने फडकत आहे. आपल्या मातीत खूप सामर्थ्य आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे भारत जोडो यात्रेत सहभागी..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील कोपर्डी येथे आठ वर्षांपूर्वी दुर्दैवी घटना घडली होती सदर घटनेची पीडित कुटुंबाला दिलेला शब्द पाळला मुख्यमंत्र्यांनी पाळला…

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार

vishwatmaklokswamivarta