vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तुमचा भाऊ मुख्यमंत्री झाला आहे, ज्या मागण्या आहेत मी नक्कीच हात घालणार आहे. न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करायचे आहे ते आमच्याकडून होईल,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा सोहळा पार पडला आहे.

तुमचा भाऊ मुख्यमंत्री झाला आहे त्यामुळे तुमच्या ज्या मागण्या  त्यामध्ये मी नक्की हात घालणार आहे. न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करायचे आहे ते नक्कीच आमच्याकडून होईल,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा सोहळा पार पडला आहे.

 

मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राज्यातील धनगर समाजातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा रविवारी विशेष सन्मान करण्यात आला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून धनगर समाजाची लोकं सहभागी झाली होती.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीनंतर घडलेल्या प्रसंगाची यावेळी आठवण करुन दिली.

“मी सर्व आमदारांना सांगितले आहे की तुम्ही ५० जण मुख्यमंत्री आहात. जे लोक मला भेटत आहेत त्या सगळ्यांनाच वाटत आहेत आहे की आम्ही मुख्यमंत्री आहोत. एकनाथ शिंदे हा सर्वांचाच मुख्यमंत्री आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने आम्ही युतीचे सरकार स्थापन केले आहे. अडीच वर्षांपूर्वी भाजपा शिवसेना सरकार आले नाही पण आता ती दुरुस्ती आम्ही केली आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

“काही लोकांना वाटत होतं की आमचाच अधिकार आणि हक्क आहे. आता मी उभा आहे पण माझ्या मागे मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही. पण एक सामान्य कार्यकर्ता देखील मुख्यमंत्री होऊ शकतो हे जनतेने पाहिलं आहे. बाळासाहेबांच्या विचाराने मी प्रेरित झालो. आनंद दिघे यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

“या राज्याचा मुख्यमंत्री होईन यावर मलाही विश्वास नव्हता. सुरुवातीला तीन चार दिवस झोपलोच नाही. कारण खूप मोठा कार्यक्रम हातात घेतला होता. नाहीतर आमचाच कार्यक्रम झाला असता. पण परमेश्वर पाठीशी होता. ५० लोक एकत्र आले. काही लोक गद्दार म्हणतात पण आम्ही क्रांती केलेली आहे. आमच्या क्रांतीची दखल जगभरातील ३३ देशांनी घेतली आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

“लोकांना तिथे जबरदस्ती पकडून ठेवल्याचे सांगायचे. पण तिथे तर आम्ही वाढदिवस साजरे करत होतो. सगळे आनंदात होतो. राज्यातील जनतेच्या आशिर्वादाने बाळासाहेबांच्या विचारांची लढाई लढलो आणि जिंकलो. शिवसेना भाजप युतीच्या राज्याला पंतप्रधान मोदींनी साथ दिली आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“तुमचा भाऊ मुख्यमंत्री झाला आहे त्यामुळे तुमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये मी नक्की हात घालणार आहे. न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करायचे आहे ते नक्कीच आमच्याकडून होईल,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

संबंधित पोस्ट

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा इफ्फी 2025 मध्ये प्रतिष्ठित ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कारासाठी पंधरा चित्रपट स्पर्धेच्या रिंगणात

vishwatmaklokswamivarta

मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडणार, यांच्यावर घणाघाती आरोप, भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या

vishwatmaklokswamivarta

२०१२ च्या आझाद मैदान दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ‘पॅलेस्टाईन समर्थन’मोर्च्यावर बंदी घाला! – हिंदू संघटनांची शासनाकडे मागणी…

मराठा आरक्षण ; उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांची राज्यशासनाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट सकारात्मक चर्चेनंतर श्री. जरांगे यांनी उपोषण घेतले मागे

कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता – कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती कामगारांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित शेतकऱ्याना मदत करण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य· मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील· अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी वितरणास मान्यता

vishwatmaklokswamivarta