vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कोरोना महामारी संपलेली नाही; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता, दिला ‘हा’ सल्ला

Coronavirus: कोरोना महामारी संपलेली नाही; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली चिंता, दिला ‘हा’ सल्ला

 

आरोग्य प्रतिनिधी

विशेष म्हणजे जगाच्या काही भागात नवीन उप-प्रकार चिंता वाढवत आहेत. यासोबतच 5 आपत्कालीन परिस्थितीत पाच गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य संघटनेने दिला आहे

कोरोना अजून संपलेला नाही. बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ही चिंता व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर भविष्यात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता डब्ल्यूएचओनेही नाकारलेली नाही. विशेष म्हणजे जगाच्या काही भागात नवीन उप-प्रकार चिंता वाढवत आहेत. यासोबतच 5 आपत्कालीन परिस्थितीत पाच गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य संघटनेने दिला आहे

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले, ‘या महामारीने आधीच धक्का दिला आहे. तसेच आता पुन्हा कोरोना महामारीचं संकट अधिक गडद होऊ शकते.’ WHO ने चेतावणी दिली, ‘जगाच्या काही भागात लोकांना वाटते की महामारी संपली आहे. ही एक सार्वजनिक आरोग्य घटना आहे. या महामारीचा जागतिक लोकसंख्येच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो

साथीचा रोग संपवण्यासाठी पाच गोष्टींवर भर द्यावा, असा सल्ला संघटनेकडून देण्यात आला आहे. यामध्ये कोविडच्या प्रकारांचा मागोवा घेणे, रूग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षमता वाढवणे, लसीकरण, परवडणाऱ्या उपचारांसाठी लोकांची उपलब्धता आणि साथीच्या रोगाविरूद्ध सज्जतेसाठी मजबूत जागतिक फ्रेमवर्क यांचा समावेश आहे.

संस्थेने म्हटले आहे की, कोविड-19 मुळे अजूनही आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी सुरू आहे. डब्ल्यूएचओच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांच्या आपत्कालीन समितीने नमूद केले की, येत्या हिवाळ्याच्या हंगामात उत्तर गोलार्धातही हा प्रादुर्भाव वाढू शकतो.

संबंधित पोस्ट

जिल्हा व्यापारी महासंघातर्फे रक्तदान शिबीर

जिल्हा रुग्णालयात सोमवारी कान, नाक व घसा तज्ज्ञाव्दारे तपासणी; 18 वर्षाखालील बालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  

हिवताप, डेंग्यू, साथरोग विषयक जाहीर जनजागृती शिबिरांचा नागरिकांनी घेतला लाभ

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाचा लाभ घ्या- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम- अभियानात दिनांक 20 सप्टेंबरअखेर 3 हजार 148 रूग्णांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान कार्ड असल्यास 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारØ नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आरोग्य सेवा सुलभ, सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना करा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना

vishwatmaklokswamivarta