vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दहशतवादाबाबत UNSC समितीची  बैठक; मुंबईनंतर आता दिल्लीतून होणार पाकिस्तानवर हल्ला…

दहशतवादाबाबत UNSC समितीची  बैठक; मुंबईनंतर आता दिल्लीतून होणार पाकिस्तानवर हल्ला…

मुंबई प्रतिनिधी

दहशतवादी हल्ल्यांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर, निधी उभारणीसाठी नवीन पेमेंट तंत्रज्ञानाचा वापर आणि ड्रोनसारख्या मानवरहित हवाई उपकरणांशी व्यवहार करण्यावर चर्चा केली जाईल. या समितीची पहिली बैठक मुंबईत झाली.

 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी (Terrorism) समितीच्या विशेष बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची बैठक आज दिल्लीत होणार आहे. या बैठकीत तीन मुद्यांवर आधारित अजेंड्यावर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर, निधी उभारणीसाठी नवीन पेमेंट तंत्रज्ञानाचा वापर आणि ड्रोनसारख्या मानवरहित हवाई उपकरणांशी व्यवहार करण्यावर चर्चा केली जाईल. या समितीची पहिली बैठक मुंबईत झाली.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची ही बैठक दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत होणार आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार आहे. आदल्या दिवशीही मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बैठक झाली. यादरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व पंधरा सदस्य देशांच्या राजदूतांनी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. आजच्या बैठकीत चीनचे राजनैतिक अधिकारीही सहभागी होणार आहेत

 

पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दहशतवादाविरोधात कठोर भूमिका दाखवली होती. त्यांनी चीन आणि पाकिस्तानवर ताशेरे ओढताना म्हटलं होत की, ‘दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा आणि मानवतेला गंभीर धोका आहे. अपघातग्रस्तांचे नुकसान अपरिमित आहे. दहशतवादाच्या गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. दहशतवादी हल्ले अस्वीकार्य आहेत.’ अशी ही बातमी मुंबई लेटेस्ट मध्ये ही आलेली आहे साभार

 

संबंधित पोस्ट

बुलडाण्यात प्रवासी बस पुलावरुन नदीत कोसळली, महिला प्रवाशाचा मृत्यू तर 17 जण जखमी

महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदीची मागणी-उपमुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !

पंतप्रधान आहेत पळणारा चित्ता ,म्हणून ते गिरवत आहेत विकासाचा कित्ता — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

अनिल देशमुखांना ईडीकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता – देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

शेतकरी आंदोलना संघटनांची आज देशव्यापी ‘भारत बंद’ची हाक…

vishwatmaklokswamivarta

मोदी सरकार पुढील दीड वर्षात 10 लाख नोकर्‍या देण्याच्या तयारीत; PM Narendra Modi यांचे मंत्रालयांना निर्देश