
मुंबई गोवा महामार्गावर आरामबस उलटून 4 ठार, 23 जखमी; एकाच रस्त्यावर दिवसातील दुसरी घटना…
मुंबई कोकण प्रतिनिधी
. मुंबई गोवा महामार्गावर आज 13 लोकांना प्राण गमवावे लागले. सिंधुदुर्गातील कणकवली येथे अरामबस उलटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर 23 जण जखमी झाले. कणकवली येथे वागदे पुलानजीक ही घटना घडली.
मुंबई गोवा महामार्गावर आज 13 लोकांना प्राण गमवावे लागले. सिंधुदुर्गातील कणकवली (Kankavli Accident) येथे अरामबस उलटून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. तर 23 जण जखमी झाले. कणकवली येथे वागदे पुलानजीक ही घटना घडली. आज दिवसभरात घडलेली ही दुसरी घटना आहे. मुंबई गोवा महामार्ग आज पहाटे रायगडजवळही एक अपघात घडला. या अपघातात 9 जणांना आपले प्रपाण गमवावे लागले.
माहितीनुसार, पहाटे 4 वाजणेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त झालेली आरामबस खासगी मालकीची होती. गडनदी पूलावर आल्यावर चालकाचे बसवरील नियंत्रण सूटले. त्यामुळे हा अपघात घडला. अपघातग्रस्त झालेली आरामबस 36 प्रवाशांना घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाली होती. अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच, तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले.जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर रायगड जवळील रेपोली गावानजिक झालेल्या अपघातात 9 जण ठार झाले. तर एक जण जखमी झाला. जखमीमध्ये 4 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. इको कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. अपघातामध्ये इको कारमधील 9 जण ठार झाले. 4 वर्षांचे मूल मात्र धक्कादायकरित्या बचावले. त्याच्यावर माणगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.



