
नवी मुंबई येथील: महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यादरम्यान उष्मघाताच्या दुर्घटनेवर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी शोक व्यक्त करत घटनेचं राजकारण न करण्याचं केलं आवाहन..
नवी मुंबई प्रतिनिधी
माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती, आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम असून त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये. असे आवाहन धर्माधिकारी यांनी केले आहे.
रविवार, 16 एप्रिल दिवशी नवी मुंबईमध्ये ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सकाळच्या रणरणत्या उन्हात खुल्या मैदानावर हा कार्यक्रम झाल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी श्री सेवकांची हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेतली. पण त्यानंतर मीडीयात बोलताना अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावरून अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एक परिपत्रक जारी करत यावरून राजकारण न करण्याचं आवाहन केले आहे.
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची महाराष्ट्र भूषण पूरस्कार सोहळ्यादरम्यान उष्मघातामुळे झालेल्या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती, आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम असून त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये.



