
नाशिकच येथील त्रंबकेश्वर मंदिर प्रवेशावरुन सध्या महाराष्ट्रात वाद पेटला.. तर.हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे’ असं या नव्या फलकात म्हटल आहे
नाशिक प्रतिनिधी
नाशिकचं त्रंबकेश्वर मंदिर प्रवेशावरुन सध्या महाराष्ट्रात वाद पेटला आहे. अज्ञात लोकांनी काही दिवसापूर्वी रात्री मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळं या ठिकाणी बराच गोंधळ सुरु आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर आता मंदिराच्या प्रवेशद्वारावर नवा फलक लावण्यात आला आहे
नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू शिवाय मंदिरात जाण्यास सक्त म्हणायचा आदेश असताना सुद्धा काही लोकांनी जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला असता तेथे एस आय टी ची स्थापना करण्यात आली आहे यावर पुढील कारवाई सुरू असून
हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे’ असं या नव्या फलकात म्हटल आहे. जुना फलक अस्पष्ट झाल्यानं हा नवा फलक लावण्यात अल्याचं सांगितलं जात आहे. मराठीसह इंग्रजी भाषेत हा फलक लावण्यात आला आहे. जुना बोर्ड हा भिंतीवर पेंट करण्यात आला होता. यामध्ये मराठीसह गुजराती आणि इंग्रजी भाषेत सूचना लिहिण्यात आली होती.
दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक वातावरणासोबत सर्वधर्मीयांमध्ये सलोख्याचे नातं आहे. एकमेकांच्या कार्यात सहभागी होण्याची इथं परंपरा आहे. सर्वांनी आपल्या परीनं सलोखा अबाधित राखावा, असं शांतता समितीच्या सदस्यांनी सांगितलं आहे. तसेच पाच आळीत कार्यक्रम असतो, या कार्यक्रमात निघणारी मिरवणूक मंदिरापुढे आल्यावर धूप दाखवली जाते. ही नवी प्रथा अथवा वेगळेपणा नाही, आम्ही सर्व देवतांना मानतो असं स्पष्टीकरणही समितीकडून देण्यात आलं आहे.
मुळातच, मिरवणूक काढणारे प्रसाद विकतात. धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या वस्त्रांची विक्री करतात. सगळ्या समाज आणि धर्मीयांचे इथं सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळं वेगळं काही घडलं असल्याचं वाटत असल्यास माफी मागतो, असंही समितीनं म्हटलं होतं.



