vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकणात अतिवृष्टीचा इशारा, तर पुण्यात मुसळधार पाऊस, पहा हवामान विभागाचा अंदाज

कोकणात अतिवृष्टीचा इशारा, तर पुण्यात मुसळधार पाऊस, पहा हवामान विभागाचा अंदाज…

 

राज्य प्रतिनिधी

राज्यभरात मागील दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.त्यामुळे हवामान विभागाने या भागात रेड अलर्ट जारी केला आहे.

राज्यभरात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात पावसाने थैमान माजवले आहे. आता राज्यात पुढील 48 तासांत अनेक भागात मुसळधार पाऊस असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. राज्यात पावसाने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने दर्शवले आहे. मुख्यमंत्रीच्या आदेशानुसार आज मुंबई, ठाणे शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जाहिर केला आहे.  कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातही मेघगर्जनेसह  पावसाचे वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  राज्यात कोकणातील घाट भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार असल्याचे प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, धर्मादाय रुग्ण योजनेसाठीची ऑनलाईन प्रणाली,रुग्णांकरीता उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता हेल्पलाईनचे उद्घाटन धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अभिलेख्याचे स्कॅनिंग आणि डिजिटायजेशन धर्मादाय आयुक्त विभागाचे कामकाज लोकाभिमुख-:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विद्यार्थ्यांनी पुस्तकांची साथ कधीही  सोडू नय- सचिव गि. ग. कांबळे. – कायदेविषयक शिबीर, जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांकडून शिवाजी चौकातच ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन

मुंबईतील दुर्घटना : ‘बीकेसी’मधील निर्माणाधीन पूल कोसळला; 13 मजूर जखमी,पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबद्दल रावसाहेब दानवेंची महत्त्वाची घोषणा.

vishwatmaklokswamivarta

घुगे परिवाराने प्रारंभीपासूनच आपल्यावर भरभरुन प्रेम केले-अर्जुनराव खोतकर

vishwatmaklokswamivarta