
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना बँक अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मदत ….
बुलडाणा, प्रतिनिधी:
संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना बँक अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मदत देण्यात आली.
नुकसान झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील शिवाजीनगर येथे अग्रणी बॅंक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील बँक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे ३५ कुटुंबांना जीवनावश्यक भांडी, तसेच किराणा साहित्याची मदत करण्यात आली. सदर मदत गावात जाऊन वाटप करण्यात आली.
यावेळी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक नरेश हेडाऊ, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रमेश करमकर, श्री. राजपूत, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे अविनाश महाले, श्री. पवार, श्री. मेंडके, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अमोल बाचे, बँक ऑफ इंडियाचे सिद्धेश्वर पवार, बँक ऑफ महाराष्ट्रचे चेतन वानखेडे, इंडियन ओवरसिज बँकेचे आशिष कोठारी, राजू पोपळघट, प्रभू अवचार, मंगेश पाटील उपस्थित होते.



