vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

छत्रपतींचे कधीच नाव घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला- राज ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

छत्रपतींचे कधीच नाव घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला- राज ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

 

राज्य प्रतिनिधी: छत्रपतींचे कधीच नाव घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली. तुम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेता पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कधी घेत नाही, असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. छत्रपतींचे नाव घेतल्यास मुसलमानांची मतं मिळत नाहीत, असे म्हणत त्यांनी पवारांवर टिका केली. शरद पावर यांना तुतारी निशाणी मिळाला आहे तर फुका..महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चिखल झालाय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

राजकारणाचा चिखल करणाऱ्यांना लोकांनी यांना वठणीवर आणलं पाहिजे. लोकांनी वठणीवर आणलं नाहीतर राजकारणाचा आणखी चिखल होईल..नुसतं नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हाव हे वाटणं हे ठीक आहे. पण खालच्या पातळीवर विचित्र राजकारण सुरु आहे. ज्या तरुणांना राजकारणात यायचंय त्यांना हा आदर्श देणार आहोत का? महाराष्ट्रातील जनतेने सर्वांना वठणीवर आणलं तर ठीक आहे नाहीतर महाराष्ट्राच काही खर नाही, असे ते म्हणाले. अशा प्रकार चा वातावरणं मी केव्हा पाहिलं नाही आणि लोकांनी ही पाहिलं नाही, असे ते म्हणाले.

 

 

चिन्हाचं वेगळं समीकरण पाहायला मिळतंय, यावर त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. दरम्यान ही चांगली चिन्ह नव्हेत, असे त्यांनी म्हटले. महाराष्ट्र मध्ये दुष्काळ ची परिस्थिती आहे बेरोजगार आहे. राज्या राज्यामध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते. इथले प्रश्न सोडवायला राज्यातील पक्ष असतात. असेही ते यावेळी म्हणाले.

 

मराठा आरक्षणासंदर्भातदेखील मी आधीच बोललो होतो. मी विचार करुनच बोलत असतो. त्याचे परिणाम आधीच सांगत असतो. त्यावेळी लोकांना पटत नाही पण कालांतराने कळतात.महाराष्ट्र श्रीमंत राज्य आहे. त्याला विस्कळीत करणं हे अनेकांच ध्येय असेल आणि त्याला बाकीचे त्याला बळी पडत असतील तर हे दुर्देव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षणाचा मुद्दा :मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण स्थगित,  उद्यापासून साखळी उपोषण

vishwatmaklokswamivarta

१२ वी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळाल्यास“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले” योजनेचा “आधार”

मोठी बातमी- जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याप्रकरणी दोन जणांना एनआयएकडून अटक

कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

vishwatmaklokswamivarta

शिवसेना कधीही हिंदूत्वापासून दूर राहू शकत नाही’- सीएम उद्धव ठाकरे

शिवाजी पार्क येथे पार पडणार शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा; पहा उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे थेट