
महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त*
वीरशैव धर्माबद्दल अभ्यास करून मग बोला*
आपल्या देशातील व महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय व्यक्तीने पूर्ण अभ्यास केल्याशिवाय वीरशैव धर्माच्या अभ्यासकांची साहित्यिकांची व मानवधर्म सेवकांची मन दुखवू नये गढूळ वातावरण करू नये शिवभक्तांमध्ये तेढ निर्माण करू नये अशी कळकळीची सेवापूर्वक नम्र प्रार्थना सत्य जाणा सत्य बोला बसवेश्वर जयंती निमित्त बरेच व्याख्याते महात्मा बसवेश्वर यांनी वीर शैव धर्माची स्थापना केली असे म्हणतात परंतु हे चुकीचे आहे वीरशैव धर्म बाराव्या शतका अगोदरपासून आहे. महात्मा बसवेश्वर हे वीरशैव धर्माचे प्रसारक आहेत
वीरशैव धर्म हा सनातन म्हणजे 5000 वर्षांपूर्वीचा आहे या धर्माची स्थापना युगानयुगे श्रीमद जगद्गुरु पंचाचार्यांनी केलेली आहे या धर्माची मुख्य पाच पीठे आहेत रंभापुरी उज्जयनी केदार श्रीशैल्य व काशी या पिठाच्या भारतात अनेक उपशाखा आहेत
महात्मा बसवेश्वरांना आठव्या वर्षी कुडल संगम येथे वरील पाचपिठांपैकी उज्जैन शाखेचे जात वेदमुनी शिवाचार्य यांनी दीक्षा दिली व पुढे या धर्माची विशालता अनुभवून या धर्माचा त्यांनी प्रसार केला आजही आपणास महात्मा बसवेश्वरांचे गुरु जातवेदमुनी यांचे देऊळ कुडल संगम येथे प्रथम पहावयास मिळते तरी आपण ते जरूर पहावे
*सर्वधर्मांचे मूळ हे शिवच आहे* जागतिक शांतता ,न्याय, समता, सलोखा, राष्ट्रीय एकात्मता नांदण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत .श्री श्री श्री 1008 जगद्गुरु पंचाचार्य हेच विश्वगुरू आहेत
मानव धर्माचा विजय असो
धर्मानेच विश्वाला शांती मिळते
जागतिक विक्रमवीर
मानवधर्माचे सेवक
श्री श्रीधर श्रीराम पैलवान
तासगाव
मो. नंबर- 9527806750



