
राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी साधला संवाद..
जालना (प्रतिनिधी) : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जालना शहरातील गुरु गणेश भवन येथे राजस्थानी, गुजराती,सिंधी समाज बांधवांसोबत संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात भारताने आर्थिक , औद्योगिक, कृषी क्षेत्र ,माहिती तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात गरुड झेप घेतली असून देश सुरक्षित ठेवला आहे. जगाच्या पाठीवर भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्यासह महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे नमूद करत जागतिक पातळीवर भारत देश तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करावे लागेल त्यासाठी कमळ निशाणी समोर मतदान करून केंद्रीय मंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा असे आवाहन भजनलाल शर्मा यांनी केले. यावेळी राज्यसभेच्या खासदार विजयाताई रहाटकर, राजस्थानचे कॅबिनेट मंत्री जोगाराम कुमावत,आ. ओमप्रकाश पोकर्णा, उद्योजक घनश्यामदास गोयल, वीरेंद्र धोका, विजय कामड, अर्जुन गेही, राजकुमार कुकडेजा,धिरू भाई गोहेल,गोपाल तिवारी,सुभाषचंद्र देविदान, सुदेश करवा, गोविंद गोयल,,कमलबाबू झुनझुनवाला,संजय राठी, मनिष तवरावाला,उमेश अग्रवाल, उमेश पंचारिया,महेश भक्कड,संतोष खंडेलवाल डॉ.धरमचंद गादीया, चेतन देसरडा,
यांच्या सह सकल राजस्थानी, गुजराती,सिंधी समाज बांधवांची उपस्थिती होती.
__________
टिप : फोटो सह बातमी प्रसिद्ध करावी ही विनंती.



