
सतीश घाटगे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला मोसंबी फळबागायतदाराना भरपाई देण्याची मागणी :
जालना प्रतिनिधी: यंदाच्या उन्हाळ्यात घनसावंगी व अंबड तालुक्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य पाहायला मिळाले. पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या मोसंबीसह इतर फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजपा नेते सतीश घाटगे यांनी सोमवारी केली.
दुष्काळात होरपळून जळलेल्या मोसंबी बागांची सतीश घाटगे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. अंबड व घनसावंगी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी धडपड करून लाखो रुपये खर्च करूनही आपल्या मोसंबी बागा यंदाच्या दुष्काळात वाचवू शकले नाही. शेतकऱ्यांची अनेक वर्षाची मेहनत वाया गेली असून लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीने भरपाई देण्याची मागणी सतीश घाटगे यांनी केली असून भरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे उपस्थित होते.
प्रतिक्रिया



