vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ

शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ

          नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विदयार्थ्यांकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी लाभार्थी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावयाची प्रथम मुदत दि. 20/06/2025 ते दि. 31/ 07 / 2025 पर्यंत होती. त्याचप्रमाणे दि. 15/08/2025 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणेकरीता जाहीर आवाहन प्रसिध्द करण्यात आले होते.

          त्यानंतर वरील योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावयाची व्दितीय मुदत दि. 15/08/2025 पर्यंत व विहित नमुन्यातील ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यास दि. 31/08/202 रोजीपर्यंत व्दितीय मुदतवाढ त्याचप्रमाणे लाभार्थी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करावयाची तृतीय मुदत दि. 15/09/2025 पर्यंत व विहित नमुन्यातील ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यास दि. 30/09/2025 रोजी पर्यंत तृतीय व अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती.

          त्याअनुषंगाने शिष्यवृत्ती अर्जाची तपासणी केली असता ज्या लाभार्थ्यांनी शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्जांसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, अशा लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणेकामी अर्ज पुनश्च: पाठविण्यात (Send Back) आलेले आहेत.

          तरी सदर लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करणेकामी दि. 04 मार्च 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. त्याबाबतचे SMS लाभार्थ्यांना त्यांचे भ्रमणध्वनीवर पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करणा-या लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील, याची कृपया सर्व संबधितांनी नोंद घ्यावी.

0000

संबंधित पोस्ट

पाळीव श्वान मालकांनी श्वान परवाना घेणे बंधनकारक

चिखली चे गट शिक्षण अधिकारी विरुद्ध कारवाई न झाल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु शिक्षणाधिकारी प्राथमिक हेच पाठीशी घालत आहे

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

vishwatmaklokswamivarta

पंचायत समिती कल्याण येथे कीटकनाशके हाताळणी, साठवणूक व फवारणीसाठी शेतकऱ्यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

महिला व बालविकास विभागाने योजनांची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोन ठेवावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

सौर ऊर्जा प्रकल्पाची दलित आदिवासी जमिनीत बळजबरी उभारणी केल्यास तीव्र आंदोलन छेडू – अ‍ॅड. भास्कर मगरे