
संविधान वाचविण्यासाठी आजाद समाज पार्टी ४० ते ५० जागांवर विधानसभेच्या निवडणूका लढणार
मुंबई प्रतिनिधी
मुंबई- वंचित समाजाच्या रक्षणासाठी , न्यायहक्कांसाठी , आणि संविधान वाचवण्यासाठी आजाद समाज पार्टी विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात 40- 50 जागांवर लढणार असल्याचे आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी अविनाश शांती, महाराष्ट्र अध्यक्ष आनंद लोंढे, इम्तियाज पिरजादे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचे नेतृत्वाखाली लढणार असल्याचे त्यांनी सांगितले .
आजाद समाज पार्टी व भीम आर्मीचे संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशानुसार वंचित, पिडीत , उपेक्षित दलित एससी एसटी घटकांसाठी , आणि गरीब मराठा समाजासाठी समविचारी पक्षांना एकत्र करून त्यांचेशी समन्वय साधून निवडणुका लढविणार आहे .
भाई चंद्रशेखर आझाद यांची महारॅलीची तयारी करण्यात आली आहे . यामध्ये मुंबई, धुळे, अमरावती, नागपुर, औरंगाबाद व सोलापूर या ठिकाणी मोठ्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत . तसेच सर्व राखीव जागावर त्या त्या समाजाच्या संख्येप्रमाणे उमेदवारी दिली जाईल. अर्थात मुस्लीम बहुल क्षेत्रांमध्ये मुस्लीम उमेदवार, एससी राखीव मध्ये एससी उमेदवार या फार्मुल्या नुसार उमेदवार निवडण्यात येणार आहे .
औरंगाबाद मध्य ” डॉ. नामवंत”, औरंगाबाद पुर्व पटेल बिरादरी” औरंगाबाद पश्चिम “राखीव ” सोलापूर मध्य “काँग्रेसचे माजी महापौर ” मोहोळ ” माजी आयएएस’, महापौर नगरसेवक”, धुळे, नागपूर, अमरावती, अचलपूर परतवाड माजी 11 नाशिक, भिंवडी, मालेगांव, नांदेंड , भायखळा, वांद्रे, कुर्ला जवळपास ४० ते ५० जागा”मुंबई मधील बहुतांश उत्तर भारतीय बहुसंख्य मतदार संघामधील पक्ष निवडणूक लढवणार आहे.



