vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी ठरणार कॅन्सर पेशंटस एड असोसिएशन (सीपीऐऐचे ) पुनर्वसन केंद्र

कॅन्सर रुग्णांसाठी संजीवनी ठरणार कॅन्सर पेशंटस एड असोसिएशन (सीपीऐऐचे ) पुनर्वसन केंद्र

 

सुरेश गायकवाड याच कडून

मुंबई प्रतिनिधी :

मुंबई- कॅन्सर रुग्णांचा स्वाभिमान आत्मविश्वास , मानसन्मान वाढावा त्यांचा आर्थिक विकास व्हावा . ते शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे . त्यांच्या जीवनाची आशा पल्लवित व्हावी . त्यांच्या सर्वांगीण विकासा सोबत त्यांच्या कुटुंबियांचा ते आधारवड व्हावे या उदात्त हेतूने कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर पेशंटस एड असोसिएशन ( cpaa ) हे पुनर्वसन केंद्र त्यांच्यासाठी संजीवनी ठरते आहे असे या केंदाच्या कार्यकारी संचालिका मंजू गुप्ता यांनी आयोजित केलेल्या प्रेस क्लब येथील पत्रकार परिषदेत सांगितले . त्यावेळेस डॉ. सुमन अग्रवाल , संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अलका सप्रू , रूपा दलाल आदी मान्यवर उपस्थित होत्या .

 

      त्यावेळेस त्या म्हणाल्या , हे पुनर्वसन केंद्र गरीब, दुर्बल घटकातील कॅन्सर रुग्णाचे पुनर्वसन करते . त्यांना जगण्याची प्रेरणा देते. त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन आर्थिक सबळ होण्यासाठी पुढाकार घेते. या केंद्राने आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक कॅन्सर रुग्णांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन केले आहे. या पुनर्वसन केंद्रामध्ये कॅन्सर रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारच्या हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन मोमबत्ती बनविणे , विविध रंगाचे नॅपॅकिन बनविणे , दिवे बनविणे , टेलरिंग , भरतकाम , स्क्रीन प्रिटिंग , बॉक्स बनविणे, ब्रेस्ट प्रोस्थेसिस क्रॉफ्टिंग आदी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते . त्यांच्या हस्ते करण्यात आलेल्या वस्तूंची विक्री करून त्यांचा मोबदला त्यांना दिला जातो .

 या केंद्रात कॅन्सर रुग्णांना प्रशिक्षणा दरम्यान त्यांचे साठी आवश्यक असलेल्या रोजगारासंबंधी , त्यांच्या औषधा संबंधी , त्यांच्या कुटुंबियांसाठी जसे की राशन , शाळेची फी , त्यांच्या भाड्यासंबंधी , त्यांच्या आत्मनिर्भरपणासाठी पुढाकार घेतला जातो.

या पुनर्वसन केंद्राची स्थापना १९८७ साली झाली. अगदी त्या क्षणापासून , त्या दिवसापासून कॅन्सर झालेल्या रूग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांचा आधारवड होण्यासाठी खारीचा वाटा उचल ता आला तरी जीवनाचे सार्थक झाले अशी आमच्या सर्व पदाधिकाऱ्याची सभासदाची कार्यकर्त्यांची निरवळ भावना आहे . ही भावना असल्यामुळे ताज सारख्या मोठमोठया हॉटेल्स , कार्पोरेट हाऊसेस , प्रदर्शने , ट्रेड शो , रिटेल आउट

लेटस माध्यमातून कॅन्सर रुग्णांना मदत केली जाते . त्यामुळेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे केंद्र एक एक पाऊल पुढे टाकते आहे अशा केंद्राला दानशूर व्यक्तींनी आणि गरीबगरजूनी भेट दयावी . आणि ज्या कुणा व्यक्तींना कॅन्सरच्या रोगांसंबंधी मोफत तपासणी करावयाची असल्यास त्यांनी केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले .आहे

संबंधित पोस्ट

फणसावरील संशोधनासाठी कृषी विद्यापीठांतर्गत केंद्र स्थापन करण्यात येईल- कृषिमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या भावना विचारात घेऊनबैठक घेण्याचे सभापतींचे निर्देश..

महिला सुरक्षा व न्यायासाठी महिला काँग्रेसचा जालना शहरात मूक मोर्चा गांधी चमनवर निषेधाची शांत आंदोलनात्मक भूमिका..

जालना-नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांच्या समृध्दी महामार्गाच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

1 जून  ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यशस्वी होण्यासाठी निरंतर वाचन आवश्यक- कुंडलिकराव अतकरे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी2 जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार- जितेंद्र भोळे