प्रवाशांच्या जिवितांचे रक्षण करणे हाच एकमेव उद्देश्य – दिपक कलिंगण ,नॅशनल जनरल सेक्रेटरी , जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियन
( सुरेश गायकवाड ) मुंबई प्रतिनिधी
मुंबई- मुंबईकर आपला जीव मुठीत घेऊन रेल्वेने प्रवास करीत असतात .पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेत नाही . ही जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावी म्हणून जनराष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियनच्यावतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती या युनियनचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी दिपक कलिंगण यांनी दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना दिली . त्यावेळेस मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, सुधाकर कश्यप आदी पदाधिकारीसह अनेक मान्यवर उपस्थित होते .
यावेळेस त्यांनी सांगितले की , रेल्वेचे जे प्रवाशी आहे ते कर्जत – कसारा , कल्याण , डोंबिवली , आदी लांबच्या पल्ल्यावरून प्रवास करीत असतात. त्यावेळेस एखादी र्दुघटना घडल्यास त्यांना युनियनच्यावतीने मदतीचा हात पुढे केला जातो , त्यांना तात्काळ औषधोपचार मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात . तसेच काही प्रवाशांना गावी जाण्यासाठी तिकिट काढण्यासंबंधी अडचणी निर्माण झाल्यास त्या सोडविण्यासाठी सहकार्य केले जाते.
एवढेच नव्हे तर प्रवाशांना सुखसुविधा मिळाव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो आहे .