vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार

 

सांगली, प्रतिनिधी: इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु झालेली आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी 100 विद्यार्थी क्षमतेचे एक व मुलींसाठी 50 विद्यार्थिनी क्षमतेचे एक अशी दोन वसतिगृहे शासनाकडून सुरू करण्यात आलेली असून या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया दि. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. अशा 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात प्रवेश मिळण्याकरिता https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळास भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे. त्या अर्जाची प्रत व त्याअनुषंगिक सर्व कागदपत्रे (सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली) या कार्यालयास दि. 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत जमा करावीत. अधिक माहितीसाठी मुलांचे वसतिगृहासाठी अधीक्षक मोबा. क्र.9763491019 व मुलींच्या वसतिगृहासाठी अधीक्षिका मोबा. क्र. 8766954163 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

दृष्टिबाधित खेळाडूंना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दृष्टिबाधित टी-20 क्रिकेट विश्वविजेत्या महिला संघातील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

vishwatmaklokswamivarta

पर्यटन क्षेत्राच्या प्रचार व ब्रँडिंगसाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी मुंबईत करावेच्या ज्ञानदीप शाळेत चिमुकल्या बाल हातांनी घडविल्या पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV ची बारीक नजर पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये काम पुर्ण; उर्वरित शाळांमध्ये एप्रिल २०२६ अखेरपर्यंत शीघ्रतेने CCTV बसविणार…

भारतीय तटरक्षक दलाने जीएसएलच्या नवीन पिढीच्या ‘अमूल्य’ फास्ट पेट्रोल व्हेसलला सेवेत दाखल

vishwatmaklokswamivarta

पदवीबरोबरच कौशल्यही महत्त्वाचे; उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त सोहळा