vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग

तपोवनातील लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे आधार सिडींग

    अमरावती, प्रतिनिधी : तपोवनात राहणाऱ्या कुष्ठरोगी लाभार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेसॲपद्वारे आधार सिडींग करण्यात आले. तसेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या सहायाने खाते उघडण्यात आले.

  जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथील लाभार्थ्यांचे आधार बँक सिडींग करण्यासाठी समस्या निर्माण झाली. यातील कुष्ठरोगी लाभार्थ्यांसाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतर्फे फेसॲपद्वारे झिरो बॅलन्स आधार सिडींग खाते उघडण्यासाठी शिबिर पार पडले. शिबिरामध्ये 60 लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे झिरो बॅलन्स आधार सिडिंग करण्यात आले.

  शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची जोडणी असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे. मात्र कुष्ठरोगी लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुष्ठरोगी लाभार्थ्यांच्या डोळ्यातील बुबुळाचा फोटो घेऊन बँक खाते उघडण्यात आले. तसेच आधार सिडींग करण्यात आले.

 तसेच वयोमानाने लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे घेण्यात अडचणी येत असल्यास फेसॲपद्वारे त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने या लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे

0000

संबंधित पोस्ट

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक १७ जुलैला स्टील हब’च्या दिशेने रोडमॅपसह उद्योगवाढ, रोजगार आणि नवउद्योजकतेवर होणार सविस्तर चर्चा,उद्योग क्षेत्राशी संबंधित घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र कुमार यांचे हस्ते सफाई कामगारांना किटचे वितरण..

जात प्रमाणपत्र पडताळणी करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळावे-मेघराज भाते               

vishwatmaklokswamivarta

श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य व ब्लेन्केट वाटप

vishwatmaklokswamivarta

ईशान्य भारताच्या विकासाला नवी गती देणारा ऐतिहासिक निर्णय! 🇮🇳केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भारत सरकार, आसाम आणि नागालँड यांच्यात आसाम-नागालँड सीमावर्ती भागातील खनिज तेल उत्खननासाठी ऐतिहासिक त्रिपक्षीय सामंजस्य करार 

राज्यातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळावे ही शासनाची भूमिका- राज्यमंत्री मेघना बोर्डीकर