vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे ५५ टक्के काम पूर्ण- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे ५५ टक्के काम पूर्ण- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, प्रतिनिधी : सोलापूर विभागातील अक्कलकोट बसस्थानकाची जीर्ण झालेली इमारत नव्याने बांधण्यात येत असून, या प्रकल्पाचे ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पावसाळ्यानंतर जलदगतीने पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात विधानसभेत दिली.

सदस्य सचिन कल्याणशेट्टी यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, सन १९६१ मध्ये उभारलेले जुने बसस्थानक आता वापरण्यायोग्य राहिले नसल्याने २८.९७ कोटी रुपये खर्चाच्या पुनर्बांधणी प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. प्रवाशांसाठी तात्पुरते १२ फलाटांचे पत्र्याचे बसस्थानक उभारण्यात आले असून, वाहतूक सुरळीत सुरू आहे. बसस्थानकासाठी दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे, चारही बाजूंनी कुंपणभिंत आणि मुख्य प्रवेशद्वार इमारतीच्या मध्यभागी ठेवण्यात आले आहे. दक्षिण बाजूस नगरपरिषदेचा १५ ते २० फूटाचा काँक्रीट रस्ता असून, तो स्थानिक नागरिकांकडून रहदारीसाठी वापरण्यात येतो. मात्र या बाजूस एसटी महामंडळाच्या संरक्षक भिंतीमधून रस्ता सोडण्याचे कोणतेही नियोजन नाही. गाळे किंवा रस्त्यासाठी एसटी महामंडळाची जागा कोणालाही देण्यात येणार नाही. अशी कुठलीही मागणी आलेली नसल्याचे परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

000000**

संबंधित पोस्ट

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी एका आरोपीला अटक  

गोवंश संरक्षणासाठी मार्गदर्शक सूचना जाहिर; अवैध वाहतूक, कत्तल व अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

तेहरानमधल्या भारतीय दुतावसानं भारतीय नागरिकांसाठी सुधारित सल्ला जारी-कुठल्याही कारणासाठी इराणचा प्रवास करु इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरक्षा परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर सध्या आपला प्रवास पुढे ढकलावा..

ग्रामपंचायतींमध्ये आपले सेवा केंद्र सुरू करा* जिल्हाधिकारी संतोष पाटील*

कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात आज  सदिच्छा भेट घेतली.

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन· गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध· अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने· राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही· समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई· अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta