संजय गांधी निराधार योजना बैठकीत 54 प्रकरणे पात्र..
सांगली, प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजनेच्या सांगली शहर अंतर्गत झालेल्या बैठकीत 54 प्रकरणे पात्र तर श्रावणबाळ योजनेची 39 प्रकरणे पात्र ठरली. जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी शाखेत समितीचे अध्यक्ष तथा तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एकूण 165 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी संजय गांधी निराधार योजनेच्या 96 प्रकरणांपैकी 54 प्रकरणे पात्र व 42 प्रकरणे अपात्र ठरली. पात्र प्रकरणांमध्ये विधवा 21, दिव्यांग 20, दुर्धर आजार 05, परितक्त्या 03, अविवाहित 01, अनाथ 02, कर्करोग 02 अशी प्रकरणे पात्र ठरली. श्रावणबाळ योजनेच्या एकूण 69 पैकी 39 प्रकरणे पात्र तर 30 प्रकरणे अपात्र ठरली.
जानेवारी 2025 महिन्यामध्ये पुढील बैठक होणार असल्याने सर्व संबंधितांनी अर्ज करावेत, असे आवाहन तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांनी केले आहे.00000