vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जळगाव रेल्वे दुर्घटना धक्कादायक असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*

जळगाव रेल्वे दुर्घटना धक्कादायक असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी- जळगावहुन मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसच्या खाली चिरडल्यामुळे या प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला.जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ हा भीषण अपघात घडला आहे.हा अपघात अत्यंत धक्कादायक असून या अपघाताची सखोल चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. हा रेल्वे अपघात अत्यंत भीषण असून हृदयद्रावक आहे.या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची मनशक्ती प्राप्त होवो .मृतांच्या कुटुंबियांना सरकार ने सांत्वनपर निधी द्यावा अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ होत असून केवळ एका अफवेनं घात गेला अन् क्षणात १० प्रवाशांच्या कुटुंबीयांवर मोठं दु:ख कोसळलं आहे.प्रवशांचा गेलेला जीव पुन्हा येऊ शकत नाही. हा अपघात अत्यंत दुःखद आहे. या अपघातातील मृतांची कुटुंबियांची रेल्वे मंत्रालयाने सांत्वनपर निधी द्यावा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. असे अपघात पुन्हा होऊ नयेत यासाठी रेल्वे प्रशासनने खबरदारी घ्यावी आणि प्रवाशांनी ही दक्ष आसवे असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले. या भीषण अपघाताची पहिली माहिती या रेल्वेत प्रवास करणारे रिपब्लिकन कार्यकर्ते संदीप जाधव यांनी आपल्याला दिली आल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिल.

0000

संबंधित पोस्ट

वडगाव शेरी मतदारसंघात पुरापासून संरक्षणाच्या कामांसाठी२५० कोटीचा निधी मंजूर- उद्योगमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे२,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

राज्यातील हजारो मंदिरांचा एल्गार; देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याविरोधात ठिकठिकाणी दंड थोपटले! मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांपर्यंत ३०० हून अधिक निवेदने धडकली

vishwatmaklokswamivarta

मुंबई महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाती शक्यता…हवामान विभागाचा अंदाज

नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !‘मनाचे श्लोक’ नावाचा चित्रपट म्हणजे संत वाड्मयाचा अपमान !चित्रपटाचे नाव न बदलल्यास हिंदू समाज चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही ! – हिंदु जनजागृती समितीचा इशारा