vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या,नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या,रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर 

जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या,नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या,रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

 

जालना, (प्रतिनिधी)-जालना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांचे पीआर कार्ड व रेल्वेच्या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक,स्टेडियम उभारून रेल्वे स्टेशनपासून ग्लोबल शाळेकडे जाणार्‍या रस्त्यासंदर्भात सत्ताधार्‍यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचेजिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केली आहे.जालना शहरातील हनुमान घाट येथे स्व.बालचंद कन्हैयालाल भुरेवालद्वार या प्रवेशद्वाराचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार कैलास गोरंट्याल व सर्वपक्षीय पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाालेकी, (माजी केंद्रीय रावसाहेब दानवे यांना उद्देशून)तुम्ही पराभूत झालात
तरी केंद्रात व राज्यात तुमची सत्ता आहे. जालना शहराचे अनेक प्रश्न जे शासन स्तरावर प्रलंबित आहेत शहरात ४० टक्के गोरगरीब हे शहरातील जवळपास ५० झोपडपट्ट्यात राहतात. त्या शासकीय जमिनीवर आहेत. शासनाच्या घरकुल योजना करिता निधी येऊनही या झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांना या जागेचा मालकी हक्क नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. चार-चार पिढ्याने त्या जागेवर हे लोक राहत आहेत.त्या वस्त्यांमध्ये महानगरपालिका सर्व नागरी सुविधा ही पुरवत आहे. मग त्या नागरिकांना पीआर कार्ड का मिळू नये? ज्यामुळे या योजनांचा त्यांना लाभ मिळेल. शहरात रेल्वेची शेकडो एकर जागा आहे. स्वयंवर मंगल कार्यालय ते अण्णाभाऊ साठेनगर या प्रमुख रस्त्यावर रेल्वेच्या जागेवर मोठ्या मोठ्या बाभळीचे जंगल तयार झाले आहे. या मोकळ्या जागेवर जॉगिंग ट्रॅक केल्यास शहरातील नागरिकांना महिलांना सकाळी रस्त्यावर फिरण्याऐवजी रेल्वेच्या मैदानावर फिरता येईल. तसेच सध्याच्या रेल्वे ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज स्टेडियम उभारल्यास राज्य, विभागीय स्तरावरील अनेक क्रीडा स्पर्धा या ठिकाणी होतील. तसेच रेल्वे स्टेशन ते ग्लोबल गुरुकुल इंग्रजी शाळा हा पाचशे मीटरचा रस्ता जोडला तर गावातून जाणारे सर्व ट्रक हे रेल्वे प्लॅटफॉर्म वरून सरळ बायपास रस्त्याला जातील व वाहतूक सुरळीत होईल.
पुढे अंबेकर म्हणाले की, आपण जरी पराभूत झाला तरी केंद्रात राज्यात तुमची सत्ता आहे. सत्तेत तुमच्या शब्दाला किंमत आहे. तुम्ही शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी स्थानिक आमदार, खासदार, व शहरातील अभ्यासू नागरिक यांची बैठक घेऊन कुठलाही पक्षभेद न ठेवता हे प्रश्न सोडवावेत अशी भूमिका जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी मांडली. त्यास उत्तर देताना माजी
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, येत्या दोन महिन्यात सर्व लोकप्रतिनिधी व शहरातील काही नागरिक यांना सोबत घेऊन एक बैठक घेऊ त्यावेळी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल असे ते म्हणाले. यावेळी भास्करराव दानवे, बाला परदेशी,सुनील खरे, कपिल भुरेवाल, रविकांत जगधने,संतोष माधवले, धनराज कांबलिये यांच्यासह आदीं सर्वपक्षीय पदाधिकारी वनागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन हेमराज भुरेवाल, कचरू भरेवाल, नेमीचंद भुरेवाल, संदीप नाईकवाडे यांनी केले.
००००फोटो ओळी..४-जालना शहरातील हनुमान घाट येथे स्व.बालचंद कन्हैयालाल भुरेवालद्वार या प्रवेशद्वाराचे उद्घाटनप्रसंगी बोलतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, व्यासपीठावर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार वैâलास गोरंट्याल आदी.

संबंधित पोस्ट

विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद- 11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ‘संवाद मराठवाडयाशी’उपक्रमØ आठही जिल्हयातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन…

सरला बेट विकास आराखडा व देवगाव शनि येथील बंधाऱ्यासमंजूरी देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

साताऱ्यात महिला शक्तीचा जागर; जागतिक महिला दिनानिमित्तमहिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची भव्य बाईक रॅली

डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन…

vishwatmaklokswamivarta

धरती आबा’ आणि ‘पीएम जनमन’ योजना लोकचळवळ बनवण्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन* १५ ऑगस्टपूर्वी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश*

पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,टंचाई निवारण काळाप्रमाणेच सर्व सवलती मिळणार, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याला प्राधान्य आपत्तीग्रस्तांकडून वसुली नको; बँकाना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta