vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्यालाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण..

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्यालाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण..

 

जालना, प्रतिनिधी:- बँक ऑफ महाराष्ट्र विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर,जिल्हा अग्रणी बँक व आर्थिक साक्षरता केंद्र तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा दानापुरच्या वतीने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत नईम मोईन शेख यांना विमा रक्कमचे वितरण प्रबंधक विवेक नाचणे यांच्या हस्ते करण्यात आले.”या योजनेचा उद्देश कुटुंबियांना आर्थिक सुरक्षेची हमी देणे हा आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांची आर्थिक सुरक्षिततेसाठी विमा योजना आवश्यक आहे, तरी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विवेक नाचणे यांनी केले आहे.

 जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत गरीब गरजू कुटुंबास आर्थिक मदतीचा लाभ मिळाला असून, भविष्यातही गरजू नागरिकांसाठी या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय बँकांकडून करण्यात येत आहे.

    18 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ही योजना खुली आहे.वार्षिक फक्त 436 रुपयांच्या प्रीमियममध्ये 2 लाखांचा विमा संरक्षण मिळतो.मृत्यूनंतर कुटुंबियांना थेट आर्थिक मदत दिली जाते. असा या योजनेचा फायदा होतो.या कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक विवेक नाचणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, दानापूर शाखेचे व्यवस्थापक राहुल भिलाणे, वित्तीय साक्षरता अधिकारी कैलास तावडे उपस्थित होते. लाभार्थ्यांनी यावेळी सरकारच्या योजनेंबद्दल समाधान व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

आमदार धिरज लिंगाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 10 लक्ष रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटपजिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करु : आ. धिरज लिंगाडे

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे,· तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू

जिल्ह्यात ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांवर बंदी *नियमांचे उल्लंघन केल्यास 5 वर्षे कारावास

लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया – 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन• उत्तरदायित्व ही केवळ पाच वर्षांतून एकदा येणारी निवडणुकीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही; ती प्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी आहे…• विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे; गडबड-गोंधळासाठीचे नव्हे…

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद मंगळवारी- गुंतवणूकदार, उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन- सामंजस्य करार करण्याची संधी

पंतप्रधानांनी देशभरातील 47 ठिकाणी 16व्या रोजगार मेळ्याचे उद्घाटन केले; 51000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे केले वितरण महाराष्ट्रातील मध्य रेल्वेद्वारे मुंबई, पुणे आणि नागपूर येथे रोजगार मेळ्याचे आयोजन; 450 हून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्रे वितरित