vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज स्विकारण्यास 15 मार्च पर्यंत मुदतवाढ.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज स्विकारण्यास 15 मार्च पर्यंत मुदतवाढ.

 

रायगड प्रतिनिधी:- सन-2024-25 या वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकामी दि. 15 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असून स्वाधार योजनेकरीता पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन दि. 15 मार्च 2025 पूर्वी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड येथे सादर करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड सुनिल जाधव यांनी केले आहे.

या योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत स्विकारण्यात येत असल्याबाबत संबंधित महाविद्यालयांना सूचित करण्यात आले होते.

सन-2024-25 मधील स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे स्विकारण्यात आले आहेत. दि. 26 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये या योजनेची व्याप्ती तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांनी बँक तपशिल तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे. परंतु अर्ज व त्यासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती अद्यापपर्यंत सादर केलेल्या नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे सहाय्यक आयुक्त. समाज कल्याण, रायगड कार्यालयास तात्काळ सादर करावयाची आहेत.

संबंधित पोस्ट

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांच्या पूर्वतयारीबाबत महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा…

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा प्रारंभ !पाणी वापराच्या योग्य नियोजनासाठी जनजागृती आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड

जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५चे उद्घाटन जलव्यवस्थापनात नागरिकांचा सहयोग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी’ कायदा -तात्काळ करण्याच्या मागणीला जोर धरला !हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राज्यभर ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदने

निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करा – राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे निवडणूक पूर्वतयारी संबंधी अमरावती विभागाचा घेतला आढावा