vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

 

रायगड प्रतिनिधी:-22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन व 1 मे महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून दि.22 एप्रिल ते दि.1 मे 2025 या कालावधीत वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या आढावा बैठकीत दिले.

जागतिक वसुंधरा दिनाची यावर्षीची (म्हणजे सन 2025 ची थीम “आमची शक्ती, आमचा ग्रह” (Our Power, Our Planet) ही आहे.या कार्यक्रमाचे ब्रीद वाक्य “पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ” (“पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा “) अस राहील.दि.22 एप्रिल ते दि.30 एप्रिल 2025

या कालावधीत निसर्गाच्या “पंचमहाभूतांच्या” भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) या घटकांपैकी किमान एका घटकावर दररोज काम करण्यात यावे. यामध्ये प्रामुख्याने सध्या घडत असलेले वातावरणातील बदलांमागची कारणे नागरीकांना समजावून सांगून एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी वैयक्तीकरित्या अथवा सामुहिकरित्या पर्यावारणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी एक छोटेसे पाऊल उचलल्यास वातावरणातील हे बदल काही अंशी कमी होण्यास मदत होवू शकेल. तसेच, शाळा व कॉलेज यामध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे. सदर स्पर्धेचे उद्दिष्ट आपल्या वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन हे असावे.

दि.22 एप्रिल ते दि.24 एप्रिल, 2025 या तीन दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नदी, ओढे, नाले, तलाव व समुद्रकिनारे यांची स्वच्छता करण्याचा कार्यक्रम आयोजित करून सदर कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि विविध सामाजिक संस्था यांचा सहभाग घेण्यात यावा.दि.25 ते दि.27 एप्रिल 2025या तीन दिवशी Reduce-Reuse-Recycle यावर आधारित विविध प्रयोगांचे आयोजन शाळा, महाविद्यालये, विविध शैक्षणिक संस्थामध्ये व इतर ठिकाणी करण्यात यावे. या प्रयोगांमधून सर्वोत्तम तीन प्रयोगांची (उमेदवारांची) निवड करून त्यांचा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात यावा.

 दि.28 ते दि.30 एप्रिल 2025 या कालावधीत “पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ” या मा. मंत्री महोदया यांच्या ब्रीद वाक्यानुसार पर्यावरणाशी अनुषंगीक एक ब्रीद वाक्याबाबतचे अभियान/स्पर्धा आयोजित करण्यात यावी, प्राप्त होणाऱ्या ब्रीद वाक्यांमधून तीन उत्कृष्ट ब्रीदवाक्ये निवडण्यात यावीत. निवड केलेल्यांना प्रामणपत्र देवून सन्मानित करण्यात यावे. सदर ब्रीदवाक्य येत्या वर्षात पर्यावरणविषयक विविध कार्यक्रमांमध्ये वापरावे. प्रत्येक जिल्ह्यातून हि तीन ब्रीदवाक्ये राज्याच्या पर्यावरण दिनाच्या विविध जाहीरात फलकातून जिल्हयातील विविध ठिकाणी दर्शविण्यात यावीत.

दि. 22 ते दि.30 एप्रिल 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे व स्पर्धाचे आयोजन करुन निवड केलेल्यांचा सन्मान दि. 01 मे 2025 च्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री महोदयांचे हस्ते करण्यात यावा व दिनांक 1 मे रोजी प्रदूषण मुक्त महाराष्ट्र दिन साजरा करण्यात यावा

संबंधित पोस्ट

मारवाडी गल्लीतील रस्त्याची डागडूजी : नागरिकांत आनंदशिवसेना शहरप्रमुख दुर्गेेश काठोठीवाले यांच्या मागणीला यश..

एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रशासकीय शिस्तपालन व संसाधनाच्या प्रभावी वापराचे निर्देश; व्यापक सुधारणा आराखडा बनवावा

किशोरवयीन मुलांच्या व्यसन परावृत्तीसाठीज्ञानप्रबोधिनी देणार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण..- प्रबोधनाचे मॉड्युल यशस्वी करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश- नोव्हेंबर महिन्यातील चार रविवारी चालणार प्रशिक्षण सत्र

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्मारकस्थळी वैचारिक अभिवादन,5 डिसेंबरला डॉ.अजित रानडे यांचे ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर व्याख्यान

vishwatmaklokswamivarta

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सध्याच्या सोडत पध्दतीबाबत-शेतकऱ्यांचे अभिप्राय नोंदविण्याबाबत कृषी विभागानी केले आवाहन

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवात ‘आदर्श गाव’ संकल्पना राबवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाराज्यात 22 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीतपंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव…