vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य-कृषी योजनांसाठी ओळख क्रमांक आवश्यक

           जालना, प्रतिनिधी- शासनाच्या कृषी विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहे. तरी शेतकरी बांधवांनी तात्काळ फार्मर आयडीसाठी जवळच्या ग्राम कृषी विकास समित्या तसेच सीएससी केंद्र येथे नोंदणी करुन कृषी विभागांच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 शासन निर्णयानूसार दि.15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. फार्मर आयडी अनिवार्य असल्याने सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे आणि ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा करुन समन्वय साधण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांना देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. यासाठी ग्राम कृषी विकास समित्या, सीएससी केंद्रे तसेच क्षेत्रीय यंत्रणांची मदत घेण्यात यावी. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

संत रविदासांच्या विचारांचा व्यापक अभ्यास, प्रसार होणे आवश्यक – मंत्री ॲड. आशिष शेलार ‘स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज ॲण्ड सोशल सायन्सेस’ने तयार केलेल्या संशोधन प्रकल्पाची केंद्र सरकारकडे तातडीने शिफारस करण्याचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील सिवान येथे 5200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली.

vishwatmaklokswamivarta

सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानात रविवारी सुट्टीच्या दिवशी स्वच्छतागृहे सखोल स्वच्छता मोहीमा 

अमरावती विभागात 200 तरुणांना ‘टूरिस्ट गाइड’ बनण्याची संधी;पर्यटन संचालनालयातर्फे 7 दिवसांचे विनामूल्य प्रशिक्षण

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील अठरा नंबर प्लॅटफॉर्म सुमारे तीन महिन्यांसाठी बंद.

vishwatmaklokswamivarta

नेहरु युवा केंद्रातील राष्ट्रीय युवा स्वयंसेवकासाठी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta