vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य-कृषी योजनांसाठी ओळख क्रमांक आवश्यक

           जालना, प्रतिनिधी- शासनाच्या कृषी विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहे. तरी शेतकरी बांधवांनी तात्काळ फार्मर आयडीसाठी जवळच्या ग्राम कृषी विकास समित्या तसेच सीएससी केंद्र येथे नोंदणी करुन कृषी विभागांच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 शासन निर्णयानूसार दि.15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. फार्मर आयडी अनिवार्य असल्याने सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे आणि ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा करुन समन्वय साधण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांना देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. यासाठी ग्राम कृषी विकास समित्या, सीएससी केंद्रे तसेच क्षेत्रीय यंत्रणांची मदत घेण्यात यावी. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) यांच्या वतीने सायक्लोथॉनव्दारे व्यापक ‘गर्भाशय कर्करोग जनजागृती’

vishwatmaklokswamivarta

माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांचे निधन

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

अ‍ॅड. दिपक नाईक यांची राष्ट्रवादी शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात कोरोना वाढता प्रभाव, एका दिवसात 65 नवे रुग्ण, मुंबईत 22 संक्रमित, पुन्हा लॉकडाऊन ?आरोग्य विभाग नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे, मास्क घालण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन

सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतूक नियमन