vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अनिवार्य-कृषी योजनांसाठी ओळख क्रमांक आवश्यक

           जालना, प्रतिनिधी- शासनाच्या कृषी विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहे. तरी शेतकरी बांधवांनी तात्काळ फार्मर आयडीसाठी जवळच्या ग्राम कृषी विकास समित्या तसेच सीएससी केंद्र येथे नोंदणी करुन कृषी विभागांच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 शासन निर्णयानूसार दि.15 एप्रिल 2025 पासून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. फार्मर आयडी अनिवार्य असल्याने सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे आणि ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा करुन समन्वय साधण्याचे निर्देश कृषी आयुक्त यांना देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी. यासाठी ग्राम कृषी विकास समित्या, सीएससी केंद्रे तसेच क्षेत्रीय यंत्रणांची मदत घेण्यात यावी. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नमुंमपा पदभरती परीक्षेमध्ये दुस-या दिवशी 18442 उमेदवारांनी दिली परीक्षा…

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

नव्या काळातील बदल स्वीकारणारी पिढी ‘एमकेसीएल’ने घडवावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘चांदा ज्योती सुपर १००’ अभ्यासिकेचे उद्घाटन; जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत धारणी व चिखलदरा तालुक्यांचाडेल्टा रँकिंगमध्ये राष्ट्रीय-राज्य पातळीवर गौरव राज्यात पटकाविला अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक 

दिनांक 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो… अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार–