vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अपघातात निधन झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबियांना बँक ऑफ इंडियाच्या वतीने 60 लाखाचा विमा धनादेश सुपूर्द

अपघातात निधन झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबियांना बँक ऑफ इंडियाच्या वतीने 60 लाखाचा विमा धनादेश सुपूर्द

        सांगली, प्रतिनिधी : करंजवडे- येतवडे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात चिकुर्डे येथील प्राथमिक शिक्षक चंद्रशेखर बबन पाटील यांचे दुर्दैवी निधन झाले होते. चंद्रशेखर पाटील यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. चंद्रशेखर यांचे बँक ऑफ इंडिया चिकुर्डे शाखेमध्ये पगार खाते होते. बँक ऑफ इंडियामध्ये पगार खाते असल्यास मोफत 60 लाख अपघाती मोफत विमा संरक्षण उपलब्ध आहे. अगदी कमी दिवसामध्ये बँक ऑफ इंडियाने 60 लाखाचा विमा मंजूर करून दिला. या विम्याचा 60 लाखांचा धनादेश आज चंद्रशेखर पाटील यांच्या वारसांना बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक पुनीत द्विवेदी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

   बँक ऑफ इंडियाच्या या पगार खात्याच्या अपघाती विमा सुविधेमुळे कुटुंबियांना आर्थिक आधार मिळाला आहे. या सहकार्यामुळे पाटील कुटूंबियांनी बँकेचे आभार मानले आहेत. बँक ऑफ इंडियाच्या वतीने चंद्रशेखर पाटील यांच्या कुटुंबीयांना मदत करताना अत्यंत संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

     सर्व ग्राहकांना बँक ऑफ इंडिया पगार खाते योजनेबरोबरच बँकेच्या इतर योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन श्री. द्विवेदी यांनी यावेळी केले.      यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे, सचिन इंगवले, लखन मकानदार, विपणन विभाग प्रमुख रंगनाथ कचरे, बँक ऑफ इंडिया चिकुर्डे शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

आधार सेवांचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार

प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25-सहभागी होणेसाठी शेतकऱ्यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई सह उपनगरात धावणार अत्याधुनिक वंदे-मेट्रो लोकल

vishwatmaklokswamivarta

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta