vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अपघातात निधन झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबियांना बँक ऑफ इंडियाच्या वतीने 60 लाखाचा विमा धनादेश सुपूर्द

अपघातात निधन झालेल्या शिक्षकाच्या कुटुंबियांना बँक ऑफ इंडियाच्या वतीने 60 लाखाचा विमा धनादेश सुपूर्द

        सांगली, प्रतिनिधी : करंजवडे- येतवडे मार्गावर झालेल्या भीषण अपघातात चिकुर्डे येथील प्राथमिक शिक्षक चंद्रशेखर बबन पाटील यांचे दुर्दैवी निधन झाले होते. चंद्रशेखर पाटील यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. चंद्रशेखर यांचे बँक ऑफ इंडिया चिकुर्डे शाखेमध्ये पगार खाते होते. बँक ऑफ इंडियामध्ये पगार खाते असल्यास मोफत 60 लाख अपघाती मोफत विमा संरक्षण उपलब्ध आहे. अगदी कमी दिवसामध्ये बँक ऑफ इंडियाने 60 लाखाचा विमा मंजूर करून दिला. या विम्याचा 60 लाखांचा धनादेश आज चंद्रशेखर पाटील यांच्या वारसांना बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक पुनीत द्विवेदी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

   बँक ऑफ इंडियाच्या या पगार खात्याच्या अपघाती विमा सुविधेमुळे कुटुंबियांना आर्थिक आधार मिळाला आहे. या सहकार्यामुळे पाटील कुटूंबियांनी बँकेचे आभार मानले आहेत. बँक ऑफ इंडियाच्या वतीने चंद्रशेखर पाटील यांच्या कुटुंबीयांना मदत करताना अत्यंत संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

     सर्व ग्राहकांना बँक ऑफ इंडिया पगार खाते योजनेबरोबरच बँकेच्या इतर योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन श्री. द्विवेदी यांनी यावेळी केले.      यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे, सचिन इंगवले, लखन मकानदार, विपणन विभाग प्रमुख रंगनाथ कचरे, बँक ऑफ इंडिया चिकुर्डे शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

36104 नवी मुंबईकर विद्यार्थ्यांनी घेतला सन 2024-25 वर्षात शिष्यवृत्तीचा लाभ..           

पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत; १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांची टीका …

जालना जिल्ह्यात 25 ते 27 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी-  विजेच्या कडकडाटासह 25 ते 27 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता-नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे

दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा..नवी मुंबईकर नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लोकाभिमुख प्रशासन, अबाधित कायदा व सुव्यवस्थेस प्राधान्य- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta