vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील खाडीपात्रातील वाळू उपसा थांबला-जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ठाणे जिल्ह्यातील खाडीपात्रातील वाळू उपसा थांबला-जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील खाडीपात्रांमधून होणारा वाळूचा अनधिकृत उपसा थांबविण्यात आला आहे. ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि संबंधित तहसिलदार उमेश पाटील यांनी संयुक्तपणे ही कार्यवाही केली.

उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या वाळू गटांची पाहणी/तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले होते. या निर्देशानुसार, ठाणे उपविभागातील खाडी भागातील विविध वाळू गटांची पाहणी करण्यात आली. यात प्रामुख्याने वसई खाडी (गायमुख बंदर, कामवाडी नदी) आणि उल्हास नदी (डोंबिवली ते कल्याण) या भागांचा समावेश होता.

वसई खाडीपात्रातील पाणजू बेट ते घोडबंदर वाळू गटातील मौजे वरसावे येथील खाडीलगत मळई क्षेत्र 0-80-0 हेक्टर आर जमीन, गायमुख बंदर ते कामवाडी नदी या वाळू गटातील मौजे गायमुख (भाईंदरपाडा) येथील खाडीलगत मळई क्षेत्र 0-60-0 हे.आर. जमीन आणि उल्हास नदी खाडीपात्रातील डोंबिवली ते कल्याण वाळू गटातील मुंब्रा रेतीबंदर, मौजे कळवे येथील खाडीलगत मळई क्षेत्र 0-80-00 हे. आर जमीन या तीन ठिकाणी प्राप्त माहितीनुसार, शासकीय जागेत वाळू साठा दिसून आला आहे. तसेच दरम्यानच्या भागात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पाहणीत अनियमितता आढळल्याने तातडीने वाळू उपसा थांबविण्याचे आदेश देण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील खाडीपात्रांचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापुढेही अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या कारवाईत प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार उमेश पाटील यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

00000

संबंधित पोस्ट

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला;वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा तालुक्यातील 66 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम नागरिकांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महिला बचत गटांच्या वस्तू प्रदर्शन,*महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी आदींनी दिली भेट*

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांची पेट्रोल पंपांवर अचानक भेट; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन,थेट पंपांवर जाऊन केली इंधन साठ्याची प्रत्यक्ष तपासणी !साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा !