vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

भोकरदन, प्रतिनिधी-भोकरदन तालुक्यातील मौजे जवखेडा ठोंबरे येथील गट नंबर २५१ मधील असलेल्या विद्युत पुरवठ्याच्या शॉर्टसर्किटमुळे शेतकरी महिला मुक्ताबाई सकलादी ढवळे यांच्या जमीनीतील मक्काची गंज्जी, पुंज,शाळु चारा, मक्का चारा इत्यादी वस्तुचे झालेले नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्यात येवुन नुकसान भरपाई देण्यात यावी, आदी मागण्याचे निवेदन भोकरदन महावितरणच्या उपअभियंत्याला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी दिले आहे.उपतालुकाप्रमुख ठोंबरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे जवखेडा ठोंबरे शिवारातील गट नंबर २५१ मध्ये मुक्ताबाई सकलादी ढवळे यांच्या मालकीची व ताब्यातील शेतजमीन क्षेत्र. ०.हे.४० आर मध्ये त्यांची सालाबादाप्रमाणे कुटुबांच्या उदरनिर्वाह करण्यासाठी व मुलांच्या भवितव्यासाठी खरीप हंगाम मध्ये मक्का पिकाची लागवड केली व गट नंबर २३४ मधील शाळु चारा गट नबर २५१ मध्ये त्यांनी आणुन ठेवला होता. मक्काची गंज्जी,पुंज व मक्काचे पिक असे हा ३० एप्रिल रोजी दुपारी शॉटसर्किट होवून त्यांच्या शेतातील पिकाचे व चार्‍याचे न भरुन येणारे १ लाख ३० हजार रुपयेव केबल,शेती उपयोगी पीव्हीसी पाईप, विहीरीतील मोटार पाईप ज्यांची अंदाजे किमंत दहा हजार रुपये असे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी महिलेचा सहानुभुतीपुर्वक विचार करण्यात यावा. आपल्या कार्यालयाकडुन त्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ करण्यात येवुन त्या संबधीत गरीब शेतकरी महिलेस नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी उपअभियंता महावितरण भोकरदन यांच्याकडे केली आहे.

००००००

संबंधित पोस्ट

श्री क्षेत्र धामणगाव देव येथील यात्रा महोत्सवात भाविकांच्या सुविधेसाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचे आयोजन; सुमारे ५० हजार भाविक येण्याचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अकोला दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यक्रम साध्या पद्धतीने घेत मृत प्रवाशांना श्रद्धांजली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल! राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला गती;जिल्ह्यात 423 तरुणांच्या उद्योगांना बँकेचे बळ