vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नागरिकांना जलद सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा-महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर

नागरिकांना जलद सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा-महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर

 

सातारा: प्रतिनिधी   शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांपर्यत जलद पोहोचवून नागरीकांचे जीवन सुखकर बनविण्यासाठी ऑनलाईन सेवा देण्याचे धोरण अवलंबिले आहे. यासाठी सर्व सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा, असे आवाहन महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांसोबत राईट टू सर्व्हीस अंमलबजावणी आणि ऑनलाईन सेवा पुरविणाऱ्या केंद्र चालकांच्या क्षेत्रीय कामकाजाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, जावळी (मेढा) तहसीलदार श्री. कोळेकर आदी उपस्थित होते.

शासनाकडील सेवा मिळवणे हा नागरीकांचा अधिकार झाला असून त्या सेवा अधिसुचित होऊन लवकर मिळण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध झाल्या पाहिजेत हा शासनाचा मानस आहे, असे सांगून श्री. काटकर म्हणाले, शासनाने 15 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करण्याचे निर्देश दिले आहेत, नागरिकांच्या समस्या सोडवू शकलो तरच नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी पारदर्शी, सकारात्मक वातावरण होईल. ऑनलाईन सेवा देताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान अद्ययावत करण्यात येणार आहे. इंटरनेटसह पायाभूत सूविधा देण्यात येणार आहे. क्षमता बांधणीसाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सेवाकेंद्राच्या कर्मचाऱ्यांना उपयोगी असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने तरतूदही केली आहे, असेही ते म्हणाले.

या बैठकीत शासकीय कार्यालय प्रमुखांसह, शासनाच्या विविध ऑनलाईन सेवा पुरविणाऱ्या केंद्रचालक यांनी ऑनलाईन सेवेतील येणाऱ्या अडचणी मांडल्या.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

पानसरे हत्या प्रकरणात गोवण्यात आलेले निष्पाप समीर गायकवाड यांचे निधन ! समीर यांचे निधन, हा व्यवस्थेने घेतलेला बळीच ! – सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर १० जून रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा

हर घर तिरंगा’ मोहिमेत विविध उपक्रमांचे आयोजन