vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजीत ‘लघु उद्योजक प्रशिक्षण’ कार्यक्रमास उद्योजकांचा प्रतिसाद

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजीत ‘लघु उद्योजक प्रशिक्षण’ कार्यक्रमास उद्योजकांचा प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्यातील लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजीत ‘लघु उद्योजक प्रशिक्षण’ कार्यक्रमास उद्योजकांनी उत्तम प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील १३० लघु उद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला.

 येथील देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थायेथे हे प्रशिक्षण पार पडले. दि. आसरा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील १३० लघु उद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. दि. आसरा फाउंडेशनचे स्नेहा नन्नावरे, प्रकाश आगाशे, उद्योजक शिवप्रसाद जाजू, डॉ. आनंद गोडसे, आशीष गर्दे यांनी मार्गदर्शन केले. विशेष कार्य अधिकारी कृष्णा कांगुले हे यावेळी उपस्थित होते.याठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, माविम, अपंग व वित्त विकास महामंडळ इ. महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते. प्रास्ताविक उपायुक्त श्रीमती विद्या शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सहायक आयुक्त. सुरेश वराडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेश बहुरे, योगेश उगले, शालिक चौधर, विरेंद्र चव्हाण, गजानन खोकड, रामदास फुले, नागेश मिटकरी, प्रीतम सोनवणे, आदित्य चोपडे आदींनी परिश्रम घेतले.

०००००

संबंधित पोस्ट

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मार्गदर्शकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम..

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त संसदेच्या केंद्रीय सभागृहात त्यांच्या प्रतिमेस सदस्यांनी पुष्पांजली अर्पण केली.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !वारकरी महाअधिवेशनात निर्धार : तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत; धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कायद्याची मागणी!

vishwatmaklokswamivarta

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासूनविद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान 

पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत कार्यक्रमात प्रतिपादन- जलसाक्षरता, पाणीबचत, पुनर्वापरासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातून दिशा…

मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी संकटकाळात राज्यशासन पूरग्रस्तांच्या पाठीशी; सर्वतोपरी मदत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta