vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेश

वैष्णवी मृत्यू प्रकरण- गृहविभागाची सर्वात मोठी कारवाई- आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर पदभार काढून घेतला

 वैष्णवी मृत्यू प्रकरण- गृहविभागाची सर्वात मोठी कारवाई- आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर पदभार काढून घेतला

 

राज्य प्रतिनिधी –

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणेनं 16 मे रोजी आत्महत्या केली. सुनेचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे,  सुशील हगवणे, लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि सर्व कुटुंबाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.  वैष्णवी मृत्यू प्रकरणी संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या कोठडीची हवा खात आहे. गृहविभागाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे.   वैष्णवी मृत्यू प्रकरणात गृहविभागाने सर्वात मोठी कारवाई केली आहे.  विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाने चांगलाच दणका दिला आहे.  नाशिक संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला आहे.  सुपेकर यांचे नाव वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणात जुळवण्यात आलं होते. सुपेकर हे सध्या पुणे कारागृहाच्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. सुपेकर हे शशांक हगवणे याचे मामा असल्याने त्यांचा या प्रकरणात जुळविले गेले आहे.

वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक हगवणे याचे मामा जालिंदर सुपेकर हे पोलीस महानिरीक्षक आहेत. त्यांनी याप्रकरणात हगवणे कुटुंबाला मदत केली असण्याची दाट शक्यता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली होती. याबाबत झी २४ तासनं पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा सुपेकर यांनी दमानियांचे आरोप फेटाळून लावले होते. तसंच आपला हगवणे कुटुंबाशी या प्रकरणात कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी सांगितले होते.

तर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील भूमिका स्पष्ट केली होती. सुपेकरांचा हगवणेला वाचवण्यात सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई करू असं अजित पवार म्हणाले होते.  वैष्णवीला मृत्यूच्या दिवशीही मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या 30 खुणा आढळल्यात. त्यातील 15 जखमा या मृत्यूपूर्वी 24 तासाच्या आतल्या असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. तर दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून माहिती देण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

अंबादेवी, एकविरादेवी परिसराच्या विकासाला गती द्यावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*श्री रूख्मिणी विदर्भपीठाचा आराखडा सादर

सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्र राज्य स्‍थापना दिनानिमित्त ध्वजवंदन

नांदगाव व बखारी येथील प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव सादर करावा- मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

निर्यातक्षम आंबा बागांची मँगोनेट प्रणालीद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

परभणीतील 34 लाखांची मोबाईल चोरी उघडकीस!

येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर,कोल्हापूर येथे पहिल्या राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारांचे वितरण संपन्न..

vishwatmaklokswamivarta