vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी

जिल्हा परिषद शाळांमधील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी नाव नोंदणी करावी

रायगड प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनामार्फत जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मुलांमध्ये देशप्रेम जागविणे, त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण व्हावी तसेच त्यांना विविध शस्त्रांबाबत माहिती व त्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिकांमधून स्वयंसेवकांची नेमणूक करावयाची असून स्वेच्छेने काम करण्यास इच्छूक असणाऱ्या माजी सैनिकांनी आपली नावे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड यांच्याकडे त्वरीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,रायगड ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे

  प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी माजी सैनिकांचे जवळील वा गावातील शाळांमध्ये मुलांना 01 तास प्रशिक्षण द्यावयाचे प्रस्तावित आहे. माजी सैनिक स्वयंसेवक पदावर विना मानधन काम करण्यास इच्छूक असल्यास व असे माजी सैनिक सद्या शासकीय सेवेमध्ये काम करत असल्यास त्यांना प्रशिक्षणाचे दिवशी काम करण्याची मंजूरी त्यांच्या वरीष्ठ कार्यालयाकडून घेण्यात येईल. स्वयंसेवक पदावर काम करण्यास इच्छुक माजी सैनिकांची माहिती संकलित करण्याकरीता गूगल फॉर्म भरण्यासाठी माजी सैनिक ग्रृपवर पाठविण्यात आलेला आहे.

००००००

संबंधित पोस्ट

अतिवृष्टीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्तकालीन यंत्रणा मदतीसाठी सज्ज,काही सखल भाग वगळता नवी मुंबईतील जनजीवन सुरळीत

रायगड जिल्ह्यात 25 मे ते 8 जून 2025 दरम्यान जमावबंदी लागू–अपर जिल्हादंडाधिकारी

हिंगोली जिल्ह्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २७१ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्थांनी तंबाखुमुक्तीसाठी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीतील काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. थोड्याच वेळात त्यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी करण्यात येणार आहे.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न,केंद्र व राज्य शासनाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे कामकाज करावे – खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta