
जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪
विदेश प्रतिनिधी-जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪
भारत हा आशियातील प्रमुख वाढीचा इंजिन आहे, तर जर्मनी हा युरोपमधील आर्थिक महासत्ता आहे. दोन्ही देश लोकशाही मूल्यांवर आधारित असून परस्पर सहकार्याद्वारे जागतिक समृद्धीसाठी योगदान देण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
भारत–जर्मनी संबंध केवळ लोकशाहीपुरते मर्यादित नसून आर्थिक, व्यापारी, औद्योगिक, धोरणात्मक आणि संरक्षण क्षेत्रांपर्यंत विस्तारित झाले आहेत, आणि हे संबंध सातत्यानं अधिक मजबूत होत आहेत.
भारतीय समुदाय हा भारत आणि जर्मनी यांच्यातील एक दुवा असल्याचे सांगत त्यांनी परदेशातील भारतीयांचे योगदान अधोरेखित केलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या जागतिक प्रतिमेत मोठा बदल झाला असून भारत आता जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेत सुमारे 16% योगदान देत आहे.



