vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जालना महापालिके मार्फत 50000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे जागतिक पर्यावरण दिनी मा.आमदार अर्जुन खोतकर यांचे हस्ते वृक्ष रोपण करून सुरुवात… 

जालना महापालिके मार्फत 50000 वृक्ष लागवड कार्यक्रमाचे जागतिक पर्यावरण दिनी मा.आमदार अर्जुन खोतकर यांचे हस्ते वृक्ष रोपण करून सुरुवात…

 

राज्य प्रतिनिधी -मा. प्रधान सचिव नगर विकास यांनी दिनांक 2 जून 2025 रोजी च्या बैठकीत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक 5 जून 2025 पासून सन 2025 करिता राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. वृक्ष लागवडीसाठी जालना शहर महानगरपालिकेला 50000 झाडे हे उद्दिष्ट देण्यात आले आहे.तसेच दिनांक 5 जून रोजी सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थित वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून अभियानाची सुरुवात करावी असे निर्देश दिले.त्या अनुषंगाने 05 जून 2025 जागतिक पर्यावरण दिन तसेच एक पेड मा के नाम मोहीम अंतर्गत जालना शहर महानगरपालिकेमार्फत नंदनवन कॉलनी येथे जालना विधानसभेचे सन्माननीय आमदार श्री अर्जुन खोतकर यांचे शुभ हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती प्रियंका राजपूत सहाय्यक आयुक्त श्रीमती अपर्णा जाधव सहाय्यक आयुक्त श्री केशव कानपुडे तसेच कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर, विजयसिंह सांगळे, डाके, श्री आनंद मोहिते श्री सचिन पितळे इतर अधिकारी व कर्मचारी यांची लक्षणीय उपस्थित होती. कॉलनीतील माजी नगरसेवक राहुल हिवराळे तसेच कॉलनीतील रहिवासी व बहुसंख्या महिला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात ऑक्सफर्ड स्कूल जालना शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम द्वारे सन्माननीय आमदारांचे स्वागत केले व पथनाट्यद्वारे पर्यावरण संरक्षण संवर्धन करण्याचा संदेश दिला.याप्रसंगी सदर ठिकाणी 100 विविध प्रकारचे रोपे लागवड करण्यात आली.

संबंधित पोस्ट

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी बिहार व्होटर व्हेरिफिकेशनवरून इंडिया आघाडीचा एल्गार; संसदेच्या प्रांगणात यादीची चिरफाड करत केराची टोपली दाखवली..

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस- मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत देणार- जखमींच्या उपचाराचा खर्चही शासन करणार

शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ झालाच पाहिजे !* – १० सहस्र हिंदूंची मोर्चाद्वारे ललकारी…

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी*-जिल्हाधिकारी संतोष पाटील*

जागतिक लोकसंख्या दिन : सुखी जीवनाचा उपाय लोकसंख्या वाढीवर मात .