vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांच्या स्वप्नातील पूर बांधण्याचे कामाला सुरुवात व स्वच्छ पाणी देणाऱ्या RO प्लांटच्या कामाला सुरुवात… 👏🏻

हरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांच्या स्वप्नातील पूर बांधण्याचे कामाला सुरुवात व स्वच्छ पाणी देणाऱ्या RO प्लांटच्या कामाला सुरुवात… 👏🏻

राज्य प्रतिनिधी

देशातील प्रत्येक गावचा विकास हा त्या गावच्या ग्रामपंचायतची शोभा वाढवत असते, त्यासाठी त्या-त्या गावातील ग्रामपंचायतने प्रामाणिकपणे आपल्या गावातील मूलभूत विकासकामे करून घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असायला पाहिजे, अस मला वाटत.अशीच एक ग्रामपंचायत कौतुकास्पद ठरत आहे, ती म्हणजे रेणापूर तालुक्यातील हरवाडी गावची ग्रामपंचायत… हारवाडी गावामध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने त्यांना बऱ्याच आजारांना सामोरे जावे लागत होते, आता ह्याचं प्रश्नावर स्वतः ग्रामपंचायतने ग्रामपंचायत ग्रामविकास विकास निधी मधून 3 लाख रुपयांचा पिण्यायोग्य पाणी देणारा व आरोग्यासाठी लाभदायक असणारा RO प्लांट उभारण्याची सुरुवात आज केली आहे. 👏🏻

त्यासोबतच गावातील खंडोबा नगर ते जवळगा रोड पर्यंतच्या पुलाची अवस्था सुद्धा तितकीच दयनीय होती, त्यामुळे ग्रामपंचायतने हा पूल उभारण्यासाठी ‘ग्रामपंचायत ग्रामविकास विकास निधी’ मधून 5 लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आज पार पडले आहे. 👏🏻

हरवाडी गावाने ह्या दोन्ही कामांच्या स्तुत उपक्रमातुन जिल्ह्यातील बाकी गावांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. 😍

आज ह्या दोन्ही शुभारंभावेळी आमचे मार्गदर्शक श्री. श्रीखंडी भाऊ, हरवाडी गावचे सरपंच, उपसरपंच व समस्त मित्रपरिवार उपस्थित होता.

00000

संबंधित पोस्ट

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये – जिल्हाधिकारी अशोक काकडे

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी संवेदनशील भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार तात्काळ स्थलांतर करण्याच्या मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या सूचना

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित ‘खासदार क्रीडा महोत्सवा’स पुणे येथे सुरूवात, 15 दिवस 35 स्पर्धांचे आयोजन विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना आरोग्य संपन्नतेलाही तितकेच महत्त्व – मुरलीधर मोहोळ क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील क्रीडा संस्कृतीला मिळणार बळकटी – अंजली भागवत

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांना; 30, 31 जानेवारीला सांभाळून पाणी वापरण्याचं आवाहन; 12 विभागांत पाणी पुरवठा राहणार बंद

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी

एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) उत्पादित करण्यास इच्छुक व्यावसायिकांनी संगणक प्रणालीवर महाई-सेवा केंद्र किंवा वैयक्तीकरीत्या अर्ज करावेत..