हरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांच्या स्वप्नातील पूर बांधण्याचे कामाला सुरुवात व स्वच्छ पाणी देणाऱ्या RO प्लांटच्या कामाला सुरुवात… 👏🏻
राज्य प्रतिनिधी
देशातील प्रत्येक गावचा विकास हा त्या गावच्या ग्रामपंचायतची शोभा वाढवत असते, त्यासाठी त्या-त्या गावातील ग्रामपंचायतने प्रामाणिकपणे आपल्या गावातील मूलभूत विकासकामे करून घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असायला पाहिजे, अस मला वाटत.अशीच एक ग्रामपंचायत कौतुकास्पद ठरत आहे, ती म्हणजे रेणापूर तालुक्यातील हरवाडी गावची ग्रामपंचायत… हारवाडी गावामध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने त्यांना बऱ्याच आजारांना सामोरे जावे लागत होते, आता ह्याचं प्रश्नावर स्वतः ग्रामपंचायतने ग्रामपंचायत ग्रामविकास विकास निधी मधून 3 लाख रुपयांचा पिण्यायोग्य पाणी देणारा व आरोग्यासाठी लाभदायक असणारा RO प्लांट उभारण्याची सुरुवात आज केली आहे. 👏🏻
त्यासोबतच गावातील खंडोबा नगर ते जवळगा रोड पर्यंतच्या पुलाची अवस्था सुद्धा तितकीच दयनीय होती, त्यामुळे ग्रामपंचायतने हा पूल उभारण्यासाठी ‘ग्रामपंचायत ग्रामविकास विकास निधी’ मधून 5 लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आज पार पडले आहे. 👏🏻
हरवाडी गावाने ह्या दोन्ही कामांच्या स्तुत उपक्रमातुन जिल्ह्यातील बाकी गावांसमोर मोठा आदर्श ठेवला आहे. त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. 😍
आज ह्या दोन्ही शुभारंभावेळी आमचे मार्गदर्शक श्री. श्रीखंडी भाऊ, हरवाडी गावचे सरपंच, उपसरपंच व समस्त मित्रपरिवार उपस्थित होता.