vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार

ग्रामस्थांच्या दायित्वातून मिळत आहे अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार

सातारा द प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सामाजिक दायित्वाच्या भावनेतून अंगणवाडीच्या बालकांच्या सकस व पोष्टिक आहार देण्यासाठी ग्रामस्थ स्वतःहून पुढे येत आहेत. त्यांच्या दायित्वातून बालकांना सकस व पौष्टीक आहार मिळत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ फलटणच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलबाबा नगर व धुळदेव येथे करण्यात आला.

शुभारंभ प्रसंगी धुळदेव देवस्थान ट्रस्ट चेअरमन दत्तात्रय भिवरकर, बापूराव भिवारकर, महादेव चोरमले, संदीप सरक, सरपंच मनीषा पवार, व्यंकटराव दडस आदी उपस्थित होते.

 या उपक्रमांतर्गत शेंगदाणा, गुळ लाडू, खजूर, केळी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की काही ठिकाणी तर अगदी काजू , बदामही नागरिकांनी अंगणवाडतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी दिले.

 आमची मुलं घरी असे पौष्टिक पदार्थ खात नाहीत, मात्र अंगणवाडीमध्ये एकमेकांच्या संगतीने अगदी आनंदात पौष्टिक आहार फस्त करतात अशा भावनाही पालकांनी व्यक्त केल्या.

फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार दिला जातो. नागरिकांनी आपले सामाजिक दायित्व समजून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार द्यावे, असे आवाहनही बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांनी केले आहे.  प्रकाश मोरे, सचिन नाळे , अक्षय सोनवणे, सतीश ठोंबरे, हरी पवार व दत्तू खरात यांनी अंगणवाडीसाठी पौष्टिक आहार उपलब्ध करुन दिला.

00000

संबंधित पोस्ट

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी..

गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अग्रिगेटर यांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

राज्यस्तरीय तांत्रिक महोत्सव टेकसागर- २०२६ एआय हॅकाथॉन स्पर्धा उत्साहात-पिल्ले कॉलेज प्रथम, तर तासगावकर महाविद्यालयातील वेदांत कायंदेकर यांच्या ग्रुपला द्वितीय क्रमांक

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..

vishwatmaklokswamivarta

धार्मिक उपक्रमांमुळे गावात एकोपा व संस्कारात वाढ होते – भास्कर आबा दानवे लोंढेवाडी येथे भागवत कथा ज्ञानयज्ञ व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

माध्यमांनी जेंडर सेन्सिटिव्हिटीचा स्वीकार करणे काळाची गरज- वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ कार्यशाळेत आवाहन