vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन

जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पाटचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी राज्याचे महसुलमंत्री मा.ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देऊन रामनगर (सा.का.), तालुका जालना महसुल मंडळामध्ये आठ गावे सामाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

माजी आ. अरविंदराव चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मानेगांव (जहा.), मानेगांव (खा.), गणेशपुर, बाजीउम्रद, पारेगांव, जैतापुर, मोतीगव्हाण, निरखेडा पूव ही गावे रामनगर महसुल मंडळाच्या हद्दीत होती. मात्र काही महिन्यांपूव ती गावे सांवगी तलान महसुल मंडळात समाविष्ट करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी व मागणीच्या अनुषंगाने ही गावे पुन्हा रामनगर महसुल मंडळात आणावीत. शेतकरी नेहमीच रामनगर मंडळाच्या कार्यपद्धतीशी परिचित असल्याने, सध्याची व्यवस्था बदलल्याने त्यांना होणाऱ्या गैरसोयींचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. “शेतकऱ्यांची मागणी मान्य करून गावांचा पुन्हा रामनगर मंडळात समावेश करावा,“ अशी विनंती चव्हाण यांनी महसुलमंत्र्यांकडे केली आहे.

या मागण्यांचे निवेदन आज महसूल मंत्री जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांची भेट घेवून माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पाटचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिले. निवेदनाची दखल म्हणून महसूल मंत्री यांनी लवकरच या संदर्भातील मागणीचा निर्णय दिला जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेख महेमूद, अण्णासाहेब चित्तेकर, मिर्झा अन्वर, संतोष ढेंगळे, श्री. पवार आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्याशिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने राबविणार

vishwatmaklokswamivarta

हरवलेल्या मूकबधीर बालकाच्या कुटुंबाचा शोध जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत बालक कुटुंबाकडे सुपुर्द

जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’व ‘यलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी-प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद साठी भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीची शिफारस करा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेंना निवेदन