vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन

जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पाटचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी राज्याचे महसुलमंत्री मा.ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देऊन रामनगर (सा.का.), तालुका जालना महसुल मंडळामध्ये आठ गावे सामाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

माजी आ. अरविंदराव चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मानेगांव (जहा.), मानेगांव (खा.), गणेशपुर, बाजीउम्रद, पारेगांव, जैतापुर, मोतीगव्हाण, निरखेडा पूव ही गावे रामनगर महसुल मंडळाच्या हद्दीत होती. मात्र काही महिन्यांपूव ती गावे सांवगी तलान महसुल मंडळात समाविष्ट करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी व मागणीच्या अनुषंगाने ही गावे पुन्हा रामनगर महसुल मंडळात आणावीत. शेतकरी नेहमीच रामनगर मंडळाच्या कार्यपद्धतीशी परिचित असल्याने, सध्याची व्यवस्था बदलल्याने त्यांना होणाऱ्या गैरसोयींचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे. “शेतकऱ्यांची मागणी मान्य करून गावांचा पुन्हा रामनगर मंडळात समावेश करावा,“ अशी विनंती चव्हाण यांनी महसुलमंत्र्यांकडे केली आहे.

या मागण्यांचे निवेदन आज महसूल मंत्री जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांची भेट घेवून माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पाटचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी दिले. निवेदनाची दखल म्हणून महसूल मंत्री यांनी लवकरच या संदर्भातील मागणीचा निर्णय दिला जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेख महेमूद, अण्णासाहेब चित्तेकर, मिर्झा अन्वर, संतोष ढेंगळे, श्री. पवार आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

रा. सू. गवई स्मारक उद्घाटनासाठी सज्ज*अमरावतीत उभे राहिले भव्य स्मारक*जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासून विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान 

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा

करवंड येथे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी गुणवंताबाई विवाह सोहळा उत्साहात संपन्न;किल्ल्याच्या पुनरुज्जीवनासाठी शासन स्तरावरून भरीव निधी उपलब्ध करून देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

उपनगरी रेल्वेतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि क्लेशदायक- उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला भेट