मुंबईत सह उपनगरात आणि राज्यभरात रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी…
राज्य प्रतिनिधी –
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत आणि पहाटेच्या सुमारासही कोसळलेल्या पावसामुळे अनेक भागांत रस्त्यावर पाणी साचले. काही ठिकाणी पाणी घरांच्या दारापर्यंत पोहोचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत आणि पहाटेच्या सुमारासही कोसळलेल्या पावसामुळे अनेक भागांत रस्त्यावर पाणी साचले. काही ठिकाणी पाणी घरांच्या दारापर्यंत पोहोचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.रेल्वे स्थानकांच्या परिसरात पाणी साचल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सकाळी कार्यालयीन वेळेतही अनेक ठिकाणी वाहतुकीचा गतीमान वेग मंदावला. विशेषतः दादर, कुर्ला, अंधेरी, कांदिवली, भांडुप आदी भागांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याची नोंद झाली.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये अधूनमधून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सततच्या पावसामुळे कमी उंचीच्या भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली असून, पालिकेच्या आपत्कालीन पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.