धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पं.दिनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेण्याच्या योजनेस मुदतवाढ
सातारा, प्रतिनिधी: इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्यातील महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या मान्यता प्राप्त शासकीय, अनुदानीत व कायम विनाअनुदानीत महाविद्यालय, तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयं योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत बी.ए/बी.कॉम/बी.एस.सी अशा १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए /एम.एससी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता शासनाचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. या योजनेचे अर्ज् भरण्यासाठी दि. २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्यान कांचन जगताप यांनी केले आहे