vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील आझाद मैदान मराठा आंदोलनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबईतील आझाद मैदान मराठा आंदोलनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी-मराठा समाजाचे नेते  मनोज जरांगे. आपल्या उपोषणासाठी जरांगेंनी मुंबई गाठली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात पोहचताच जरांगेंनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केल्याची घोषणा केली. सरकारने मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही, मग सरकारने गोळ्या घातल्या, वीरमरण आलं तरीही चालेल मागे हटणार नाही असं जरांगेंनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.  मुंबई ही मराठी माणसांची राजधानी आहे न्याय मागायला तो सुरत गुहाटी ला जाणार का? खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. फडणवीस सांगतो होत की आमचं सरकार आलं तर न्याय देऊ दुसरे जे आहेत त्यांनी सांगितलं महाराजांची शपथ घेतली होती. मुंबई ते आता आले आहेत त्यांची मागणी मान्य करावी. आमचे सरकार पडून तुमचे सरकार आणले तुम्ही. सरकार ज्यांच्या हातात आहे त्यांना विचारावा माझ्या हातात काही नाही. त्यांच्या पक्षात त्यांच्या बंदुकीचे टोक कुणाकडे आहे? बंदूक ठेवणारे कोण आहे? हे फडणवीस यांनी सांगावे. पुन्हा पुन्हा CM झाले तरी प्रश्न का सुटत नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यांना फसवण्यात आले. यामुळे सरकारने भूमिका घ्यायला हवी. गणेश उत्सव सुरू आहे ती इथे दंगल करण्या करिता आले नाही. आरक्षण देऊ जे म्हणाले होते ते गावी पळाले आहेत? येऊन आंदोलकांना भेटावे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. आंदोलक काही दहशत वादी नाही त्यांना अपेक्षा असेल विघ्नहर्ता मागण्या मान्य करेल. सरकारने हे आंदोलन अजून चिघळू देऊ नये. मुंबईतील हॉटेल आंदोलकांना देऊ नये असे आदेश पोलिसांनी हॉटेल चालकांना दिले आहेत. जी आश्वासन मागच्या वर्षी सरकारने सरकारने दिली होती आती ती पूर्ण करावी. सरकार मध्ये वाटा घेताना काही वाटत नाही मग शिंदेंनी दिलेली आश्वासन फडणवीस का पूर्ण करत नाही?

मुंबईकरांना त्रास होऊ नये ही सगळ्यांची भूमिका मात्र सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष करू नये. लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा आंदोलन चिघळेल असं ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील म्हणाले.

ज्यांनी मराठा समाजावर सामनातून टीका केली. त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. तसंच त्यांच्यात हिंमत होती तर मुख्यमंत्री असताना का हिंमत दाखवली नाही. असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ११ फेब्रुवारीला होणार निवड.

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहून देश सुरक्षेचे कान आणि डोळे व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शौर्य, शांतता आणि जागरूकतेचा संदेश देत ‘ग्लोबल पीस ऑनर’ कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा ट्रस्टच्या मिळकतीची फेरमोजणी करा- मंत्री दत्तात्रय भरणे

वाचनाने जीवनाकडे पाहण्याच्या नवदृष्टीचा विकास   – जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर,‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत! 

अमृततर्फे मोफत ड्रोनपायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधीDGCA मान्यता प्राप्त प्रशिक्षणातून युवकांना नवे करिअर घडविण्याची संधी…

vishwatmaklokswamivarta

सखोल स्वच्छता मोहीमांच्या परिणामाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीव्दारे आढावा

vishwatmaklokswamivarta