vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांसाठी उपसा जलसिंचन वीजदर सवलतीत मुदतवाढ

शेतकऱ्यांसाठी उपसा जलसिंचन वीजदर सवलतीत मुदतवाढ..

 

राज्य प्रतिनिधी -राज्यातील शेतकऱ्यांच्या उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ९ सप्टेबर रोजी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

 दिनांक ९ सप्टेबर रोजी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर आणखी महत्त्वाचे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले. ऊर्जा, नगरविकास, महसूल आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्या प्रस्तावांवर या बैठकीत ठराव करण्यात आला.

दुसऱ्या निर्णयानुसार, नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे सत्तर कोटी, आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत.

तिसऱ्या निर्णयांतर्गत, अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी मुर्तिजापूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या दुरुस्ती खर्चासाठी निधीची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे मुर्तिजापूरच्या सिंचन क्षमतेत वाढ होऊन स्थानिक शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे.तिसऱ्या निर्णयांतर्गत, अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी मुर्तिजापूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या दुरुस्ती खर्चासाठी निधीची तरतूद करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे मुर्तिजापूरच्या सिंचन क्षमतेत वाढ होऊन स्थानिक शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे.

संबंधित पोस्ट

23 व्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका नगररचना विभागाचा माहितीपूर्ण स्टॉल

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा घेतला आढावा- पूरबाधित गावांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करूया- नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना…

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन*12 हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा

सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका ; अर्ज 30 एप्रिल पर्यंत करण्याचे आवाहन

अंबडमधील बालिकेवरील अत्याचार प्रकरणात आयोग आक्रमक; जिल्हा प्रशासनाला तातडीचा इशारा,अटक न झाल्याने संताप; पीडित कुटुंबाच्या आंदोलनाची दखल, आजच अहवाल सादर करण्याचे आदेश

जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा भागात अतिवृष्टीने झालेल्या,नुकसानग्रस्त भागाची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta